शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

४५० कोटींच्या विकासकामांना फटका

By admin | Updated: March 17, 2015 00:49 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांसह सर्व नगरसेवकांनी वर्ष २०१४-१५ च्या बजेटमध्ये टाकलेली ४५० कोटी रुपयांची कामे प्रशासनाने आज गुंडाळून टाकली.

औरंगाबाद : महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांसह सर्व नगरसेवकांनी वर्ष २०१४-१५ च्या बजेटमध्ये टाकलेली ४५० कोटी रुपयांची कामे प्रशासनाने आज गुंडाळून टाकली. मोठा गाजावाजा करून ही कामे टाकण्यात आली होती. परंतु उत्पन्नाचे मार्ग संपल्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या मूळ ५४९ कोटींच्या बजेटमध्येही ८० कोटींची तूट निर्माण झाली असून, ३१ मार्च २०१५ पर्यंत पालिका ४७० कोटी रुपयांच्या उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद सादर करून १ एप्रिल ते ३१ जुलै २०१५ पर्यंत लेखानुदानावर कारभार चालविणार आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या शॉर्ट मिनी बजेटमध्ये ४५० कोटींच्या कामांचा काहीही अंतर्भाव नाही. सध्या सुरू असलेल्या कामांचे ५३ कोटी रुपये प्रशासन येत्या चार महिन्यांत अदा करणार आहे. २०० कोटी ७९ लाख ९९ रुपये उत्पन्न ३१ जुलै २०१५ पर्यंत पालिका प्रशासन सर्व मार्गांनी कमविणार आहे. निवडणुकीनंतर नवीन सत्ताधारी आल्यानंतर ३१ मार्च २०१६ साठी नव्याने सुधारित बजेट सादर केले जाणार आहे. मावळते सभापती विजय वाघचौरे व स्थायी समिती सदस्यांसमोर प्रशासनाने चार महिन्यांसाठी लेखानुदान सादर करून त्याला मंजुरी घेतली. निवडणुकीच्या काळात प्रशासकीय खर्चासह देखभाल दुरुस्ती वगळता कुठलीही कामे होत नाहीत. जी कामे २५ टक्क्यांच्या वर गेली आहेत, त्या कामांचे बिल देणे व ती कामे करून घेण्यासाठी प्रशासन कार्यवाही करणार आहे. लेखानुदानाला मंजुरी घेतल्यामुळे आजची स्थायी समितीची बैठक शेवटचीच ठरली आहे. त्या अनुषंगाने काशीनाथ कोकाटे, त्र्यंबक तुपे, प्रीती तोतला, सुरेंद्र कुलकर्णी, संजय चौधरी, फिरदौस फातेमा आदींनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त किशोर बोर्डे, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात, लेखाधिकारी एन. जी. दुर्राणी, संजय पवार आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रशासन फेलच...प्रशासनाने स्वत:च्या क्षमतेनुसार तयार केलेले ५४९ कोटींचे बजेटचे लक्ष्यही पूर्ण करता येणे शक्य नाही. ४७० कोटी रुपयांपर्यंत प्रशासनाचे ते बजेट जाणार आहे. ८० कोटी रुपयांची तूट मूळ बजेटमध्येच निर्माण झाली आहे. एलबीटीमध्ये १२० कोटींचा महसूल कमी मिळाला. मालमत्ताकर वसुलीतून १६५ पैकी ७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. नगररचना विभागातून ७४ पैकी ४० कोटी मिळाले. मनपाच्या मालमत्तांमधून समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे प्रशासनाला मूळ बजेट पूर्ण करण्यात अडचणी येणार आहेत, असे मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले. ४एलबीटीतून ८० कोटी, मालमत्ताकर ३७ कोटी, नगररचना विभाग २१ कोटी, मनपा मालमत्ता दीड कोटी, पशुसंवर्धन विभाग ५० लाख, शिक्षण विभाग १२ लाख, रुग्णालये २५ लाख, उद्यान ५८ लाख, अग्निशमन ५२ लाख, शासकीय अनुदान २३ कोटी, इतर अनुदान १५ कोटी, कर्मचाऱ्यांकडील वसुली ९३ लाख, पाणीपट्टी १४ कोटी, इतर ४ कोटी, असे २०० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळेल, असा अंदाज आहे. पगार व भत्ते ५० कोटी, ५३ कोटी रुपये कंत्राटदारांचे देणे, ४३ कोटी सवलती, प्रशासकीय खर्च ६ कोटी, विद्युत व अग्निशमन विभाग ४ कोटी, साफसफाई ४ कोटी, श्वानदंश प्रतिबंधक योजना १० लाख, मलेरिया विभाग ५ लाख, सार्वजनिक दवाखाने १९ लाख, कुटुंब कल्याण केंद्र ८ लाख, शहरी आरोग्य सेवा ३ लाख, अन्न व भेसळ प्रतिबंध विभाग २ लाख, उद्यान संवर्धन व इतर ४१ लाख, बांधकाम विभाग व सहा कार्यालये २९ कोटी, विशेष निधी ४ कोटी, समांतरचे हप्ते २४ कोटी, २० कोटी कर्ज हप्ते फेड, शासनाचे देणे ५ कोटी रुपये.