शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

४५ टक्के भंगार बसेसवर सुरक्षिततेची ‘वरात’ !

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

जालना सध्या एसटी महामंडळाकडून सुरक्षितता मोहिमेतंर्गत मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत.

हरी मोकाशे जालनासध्या एसटी महामंडळाकडून सुरक्षितता मोहिमेतंर्गत मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, जालना विभागातील जवळपास २० टक्क्यांपेक्षा जास्त बसेस ह्या कालबाह्य झाल्या आहेत, तर ४५ टक्के बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे एसटीची सुरक्षितता मोहीम ही भंगार बसेसवर सुरु असल्याचे दिसून येत आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच १ जानेवारीपासून प्रवाशी वाढवा अभियान सुरु आहे. तर १० जानेवारीपासून सुरक्षितता अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. ‘प्रवाशी वाढवा’अंतर्गत वाहकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे तर सुरक्षिततेतंर्गत जनजागृती, मार्गदर्शन करण्यात येत आहे.एसटी महामंडळाच्या जालना विभागात एकूण चार असून २०१ बसेस आहेत. यात जालना आगारात ८०, अंबडमध्ये ६३ तर परतूर आणि जाफराबाद आगारात यापेक्षा कमी बसेसची संख्या आहे. विभागात गेल्या दोन वर्षांत नव्याने दाखल झालेल्या बसेसची संख्या २० च्या घरातही नाही. त्यामुळे जुन्या बसेसवर एसटीच्या उत्पन्नाची मदार आहे. परंतु, यातील बहुतांशी बसेस ह्या खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसेसच्या खिडकीच्या, पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे बस थांबली की प्रवाशी सहजपणे खिडकीतून ये- जा करु शकतो. त्याचबरोबर दिशादर्शक बल्ब (इंडिकेटर), आसनांचीही दैना उडाली आहे. तसेच बसला पाठीमागे रेडियम नसणे, समोरील विद्युत बल्ब अचानक बंद पडणे अशा समस्या आहेत. वास्तविक विभागात कालमर्यादा ओलांडलेल्या बसेस ह्या २० टक्क्यांपेक्षा जास्त तर खिळखिळ्या झालेल्या बसेस ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनीच या मोहिमेची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.