शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

४२६ दारू दुकानांना टाळे

By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूविक्रीच्या ४८५ दुकानांपैकी तब्बल ४२६ दुकानांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शनिवारी टाळे लागले़ ‘

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूविक्रीच्या ४८५ दुकानांपैकी तब्बल ४२६ दुकानांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे शनिवारी टाळे लागले़ ‘ड्राय-डे’ नसतानाही दारूविक्रीची दुकाने बंद असल्याने दारूविक्रेत्यांसह तळीरामांचीही मोठी गोची झाल्याची चर्चा रंगली होती़सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर ५०० मीटरच्या आतमध्ये असलेली देशी, विदेशी, वाईन विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ २० हजार लोकवस्ती असलेल्या भागातील राष्ट्रीय, राज्य मार्गापासून २२० मीटर दूर दुकाने ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात ३१ मार्चनंतर अशा देशी, विदेशी, वाईन शॉप, परमीटररूम, बिअरशॉपी, क्लब लायसन्स आदींना परवाने देऊ नयेत, अशा सूचना दिल्या होत्या़ यातील अनेक दुकानांना माल पुरवठाही बंद करण्यात आला होता़ तर काहींनी माल खरेदी न करणेच पसंत केले होते़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल रोजी जिल्ह्यातील तब्बल ४२६ दुकाने बंद ठेवण्यात आली होती़ यात देशी दारूची ४८, सहा वाईनशॉप,२४१ परमीट रूम, ३ क्लब लायसन, १२८ बिअरबार बंद झाले आहेत़ यातउमरगा विभागातील १४ देशी दारूची दुकाने, एक वाईनशॉप, ४५ परमीटरूम तर ३१ बिअरशॉपी असे ९१ दुकाने बंद झाले आहेत़ उस्मानाबाद विभागातील देशी दारुची १२, २ वाईनशॉप, ५५ परमीटरूम, १८ बिअर शॉपी अशी ८७ दुकाने बंद झाली आहेत़ भूम विभागातील देशीदारूची १३, एक वाईनशॉप, ८८ परमीटर रूम, २ क्लब लायसन्स तर ४२ बिअर शॉपी असे १४६ दुकाने बंद झाली आहेत़ तर तुळजापूर विभागातील देशी दारूची ४८, सहा वाईनशॉप, २४१ परमीटरूम, ३ क्लब लायसन्स तर १२८ बिअर शॉपी बंद झाली आहेत़ जिल्ह्यातील ४८५ देशी-विदेशी, बिअर, वाईन विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडून शासनाला जवळपास पावणेतीन कोटी रूपयांचा महसूल मिळत होता़ परवाना नुतनीकरणातूनही चांगला महसूल मिळत होता़ मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेकांचे परवाने नुतनीकरण झालेले नाही़ तर तब्बल ४२६ दुकानांना टाळे लागले आहे़ ही दुकाने वर्षभर बंद राहिली तरी जवळपास सव्वादोन कोटी रूपयांचा महसूल बुडणार आहे़ अनेकांनी दुकाने इतरत्र टाकण्यासाठी जागेची शोधमोहीम सुरू केली असून, अनेकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे़ दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महसूल बुडणार असल्याने शासन कोणता तोडगा काढते का ? याकडेही दारूविक्री करणाऱ्या व्यसायिकांचे लक्ष वेधले आहे़