धावडा: भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील फक्त ४११ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा भरला आहे. अद्याप अनेक शेतकरी वंचित असल्याने विमा भरण्यास मुदत वाढ देण्यात यावी तसेच खरीप पिकांच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी अशी मागणी होत आहे.धावडा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतंर्गत महसूल मंडळातील वालसावंगी, धावडा, वाढोणा, मेहगाव, विझोरा, वडोद तांगडा, भोरखेडा, पोखरी येथील ४११ शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार रूपये रबी पिकांचा विमा ३१ डिसेंबर पर्यंत भरला असल्याचे शाखाधिकारी जाधव व लेखाधिकारी शेख यांनी सांगितले. दरम्यान विमा भरण्याची तारीख संपल्याने परिसरातील शेकडो शेतकरी अद्याप वंचित आहे.अनेक शेतकरी यासाठी बँकेत चकरा मारत असून रबी विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
धावडा परिसरातील ४११ शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST