शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

जिल्ह्यात ४० टक्के पेरणी

By admin | Updated: June 24, 2017 00:16 IST

नांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला गत आठवडाभरापासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सात तालुक्यांत २३ जूनपर्यंत सरासरी १९ टक्के पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे़

रामेश्वर काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला गत आठवडाभरापासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सात तालुक्यांत २३ जूनपर्यंत सरासरी १९ टक्के पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे़ प्रत्यक्षात जिल्ह्यात ४० ते ४५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात खरीप ज्वारीसाठी १ लाख १२ हजार ३०० हेक्टर, उडीद-५० हजार ३०० हेक्टर, मूग-२९ हजार ९०० हेक्टर, तूर- ६९ हजार ८०० हेक्टर, सोयाबीन-१ लाख ९९ हजार हेक्टर तर कापसासाठी ३ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. त्यापैकी ज्वारी १७०० हेक्टर, उडीद २२०० हेक्टर, मूग २२०० हेक्टर, तूर ३१०० हेक्टर, सोयाबीन १६ हजार १०० हेक्टर तर कापसाची ३४ हजार ३०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सदर पेरणी नांदेड तालुका- २८०० हेक्टर १० टक्के, लोहा- १६ हजार ६०० ेहेक्टर १० टक्के, भोकर- २०९०० हेक्टर ३० टक्के, देगलूर- ७५०० हेक्टर २० टक्के, मुखेड- २३०० हेक्टर १० टक्के, हिमायतनगर- ९४०० हेक्टर ३० टक्के तर नायगाव तालुक्यात ९ हजार ९०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. असा पेरणीचा अहवाल कृषी विभागाकडे असला तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र जास्त हेक्टरवर झाली आहे. मात्र आजपर्यंत बिलोली, मुखेड, कंधार, हदगाव, कनवट, माहूर, धर्माबाद, उमरी व अर्धापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अद्यापही पेरणीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कार्यालयाकडे पाठविलाच नाही. त्यामुळे सदर तालुक्यात पेरणी झाल्याचा अहवाल निरंक आहे़ प्रत्यक्षात वरील तालुक्यात ३० ते ४० टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. गतवर्षी २३ जूनपर्यंत विविध पिकांची ८ टक्के पेरणी झाली होतीे. ७ लाख ५४ हजार ६०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ६१ हजार १०० हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्ह्यात भात,ज्वार,बाजरी,मका या तृण धान्यासाठी १ लाख ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते,तृणधान्याची १७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. तर तुर, मूग, उडीद या कडधान्याचे १ लाख ४८ हजार ४०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ११२०० हेक्टरवर पेरणी झाली होती. तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन या गळीत धान्यासाठी १ लाख ८२ हजार ५०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी १७ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीनसाठी १ लाख ७२ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते तर त्यापैकी १७ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झाली होती. कापसासाठी २ लाख ५० हजार ४०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. तुरीसाठी ६० हजार ५०० हेक्टर होते. या हंगामात सोयाबीनचे २८ हजार हेक्टर तर कापसाचे ७३ हजार हेक्टर क्षेत्र जास्तीचे प्रस्तावित आहे. दरम्यान, मागील पाच, सहा दिवसापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते़ पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती़ परंतु शुक्रवारी सायंकाळी पावसाचे आगमन झाले़