शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

४० टक्के धान्य लॅप्स !

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

आशपाक पठाण , लातूर अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल आदींसाठी शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे स्वस्त धान्य जून महिन्यांत लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे़

आशपाक पठाण , लातूरअन्न सुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल आदींसाठी शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे स्वस्त धान्य जून महिन्यांत लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय वाढली आहे़ तर दुसरीकडे धान्य देणार कधी, या चौकशीसाठी दुकानदारांचे पुरवठा विभागाकडे खेटे सुरू आहेत़ २० तारखेपर्यंत धान्य उचलले नसल्यामुळे ४० टक्के धान्य लॅप्स झाल्याची माहिती समोर आली आहे़ यात चूक नेमकी कोणाची? या विषय संशोधनाचा बनला आहे. अन्न सुरक्षा योजनेमुळे स्वस्त धान्य दुकानांत खरेदीसाठी लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे़ एपीएलधारकांचे धान्य उचलल्याशिवाय अन्न सुरक्षा योजनेतील धान्य मिळत नसल्याची ओरड आहे़ महिन्याच्या शेवटी दरमहा स्वस्त धान्याचे वितरण केले जाते़ जून महिन्यातील धान्याचा जवळपास ४० टक्के कोटा लॅप्स झाल्याने लातूर, अहमदपूर, निलंगा या तीन तालुक्यांत लाभार्थ्यांची ओरड वाढली आहे़ काही ग्राहक स्वस्त धान्य दुकानदारांशी हुज्जत घालत असल्याची ओरड आहे़ शासनाकडून मिळालेच नसल्याने धान्य नेमके द्याचे कोठून, असा प्रश्न विके्रत्यांना पडला आहे़ जिल्ह्यात दरमहा ९ हजार ५०० मेट्रिक टन धान्य वाटप केले जात असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या दप्तरी नोंद आहे़ एफसीआयच्या गोदामातून दरमहा धान्य उचलावे लागते़ मात्र, जून महिन्यात कंत्राटदार व हमालांनी संप केल्याने वेळेत धान्य उचलण्यात आले नाही़ त्यामुळे ४० टक्के धान्याचा कोटा लॅप्स झाल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली़ जळकोट, देवणी, औसा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर तालुक्यात जूनचे अन्नधान्य मिळाले असले तरी लातूर, अहमदपूर, निलंगा येथील लाभार्थ्यांकडून ओरड वाढली आहे़ लाभार्थ्यांची ओरड...जिल्हा पुरवठा विभागाकडून जुनचे धान्य वाटप झाले नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांची चांगलीच गोची झाली आहे़ अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांकडून विके्रत्यांकडे वारंवार विचारणा केली जात आहे़ परंतू धान्य मिळालेच नसल्याने आम्ही तरी देणार कोठून? असा प्रश्न लातूर शहरातील एका विक्रेत्याने सांगितले़ या महिन्यात लॅप्स झालेले धान्य पुन्हा पुढच्या महिन्यात मिळणे शक्य नाही़ अन्न सुरक्षेमुळे स्वस्त धान्य लाभार्थ्यांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे़ मात्र सध्या धान्यच मिळाले नसल्याने गरजूंची गैरसोय होत आहे़ दिल्लीतून मिळणार मुदतवाढ़़़़दरमहा २० तारखेपर्यंत धान्य उचलावे लागते़ या महिन्यात हमाल-कंत्राटदारांनी संप केल्याने वेळेत धान्य उचलण्यात आले नाही़ ४० टक्के धान्य लॅप्स होण्यास संबंधित वाहतूक ठेकेदार, हमाल जबाबदार आहेत़ एपीएलचे धान्य अगोदर उचलावे लागते़ मात्र ठेकेदाराने वाहने पुरविली नाहीत़ त्यामुळे धान्य लॅप्स झाले आहे़ यापूर्वी एफसीआयच्या पुणे कार्यालयातून लॅप्स झालेले धान्य एका दिवसांत मिळत होते़ लॅप्स झालेले धान्य मिळणार का..?आता ही प्रक्रिया दिल्लीतून सुरू झाल्याने जवळपास आणखी ४ ते ५ दिवस उशीर लागणार असून लॅप्स झालेले ४० टक्के धान्य मिळणार आहे़ त्यातून अहमदपूर, लातूर, निलंगा तालुक्याला पुरवठा केला जाणार आहे़ या तीन्ही तालुक्यांतील अंत्योदय लाभार्थ्यांचे धान्य देण्यात आल्याचे पुरवठा विभागातील पेशकार घुगे यांनी सांगितले़