शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्री संघासाठी ४0 अर्ज

By admin | Updated: April 26, 2016 23:42 IST

हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ४0 अर्ज आले आहेत.यामध्ये सोसायटी मतदारसंघात गोदावरी भगवान शिंदे, जगन नामदेव लोथे, केशव ग्यानु शांकट, जनार्दन चंद्रभान वैद्य, गोविंद फुलाजी भवर, श्रीराम कुंडलिका पठाडे, भारत मारुती बर्वे, भानुदास गोविंदराव वाबळे, नारायण व्यंकटराव जगताप, रुपाजी किशनराव गायकवाड, शंकर सीताराम शिंदे, गुलाबराव रामजी सरकटे, केशव शेषराव नाईक, शहरी विभाग मतदारसंघातून अशोक रामकृष्ण बासटवार, उमेश पांडुरंग नागरे, राजाराम तुकाराम बांगर, सचिन सूर्यकांत गुंडेवार, खेडे विभाग मतदारसंघातून सत्यनारायण रामकिशन तापडीया, राजाराम तुकाराम बांगर, रमेश विठ्ठलराव शिंदे, कुंडलिक मारोतराव नागरे, रामेश्वर आंबादास फाळके यांचा समावेश आहे.महिला राखीव मतदारसंघातून वनमाला पांडुरंग नागरे, प्रमिला राजाराम बांगर, गोदावरी भगवान शिंदे, प्रयाग बळीराम बांगर, अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघात बालासाहेब गंगाराम आरळकर, गंगाराम सखाराम लोणकर, इतर मागासवर्ग मतदारसंघात भिकाजी दगडुजी मोहनकर, बिरजू नंदलाल यादव यांचा समावेश आहे. विजाभज-विमाप्र मतदारसंघात राजाराम तुकाराम बांगर, उमेश पांडुरंग नागरे, रामचंद्र नामदेवराव वैद्य यांचा समावेश आहे.यातील अनेकांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत. २७ एप्रिलपर्यंत छाननी होणार आहे. १२ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख तर २२ मे रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एल. डुकरे हे काम पहात आहेत.खरेदी-विक्री संघाचे हाल पहाता निवडणूक घेणेही परवडणारी बाब नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. १२ मेपर्यंत वेळ असल्याने आता त्यासाठी फिल्डिंग लावली जाते की, मतदान होणार हे त्यानंतरच कळणार आहे . (प्रतिनिधी)उकाडा वाढलाकौठा- वसमत तालुक्यात कौठा व परिसरात उन्हाचा पारा वाढत असून उकाड्याने जनता त्रस्त झाली आहे. उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम दिसून येत आहे. ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. उष्माघातापासून बचाव करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.