शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

औरंगाबादेतील ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही मागे टाकले आहे. ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही मागे टाकले आहे. या चारही तालुक्यांचा मृत्यू दर औरंगाबाद जिल्हा आणि राज्यापेक्षाही अधिक आहे. या चारही तालुक्यांतील मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.

औरंगाबादेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा एकप्रकारे विस्फोट झाला. दररोज एक ते दीड हजारांच्या घरात नव्या रुग्णांचे निदान हाेत गेले. त्यात ग्रामीण भागांतही रोज पाचशेच्या जवळपास रुग्णांची भर पडत गेली. याबरोबर २० ते ३० च्या संख्येत दररोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात ग्रामीण भागांतील रुग्णांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागांतून थेट शहरात उपचारासाठी येण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. त्यातही गंभीर रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत घाटी, जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मृत्यूचा धोका वाढत आहे.

ग्रामीण भागात आतापर्यंत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १४१ रुग्णांचा गेल्या महिनाभरातच कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या चार तालुक्यांचा मृत्यूदर राज्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोना स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर

जिल्ह्यातील ९ तालुक्यांत औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर आहे. औरंगाबाद तालुक्याचा १.० टक्के एवढा मृत्यूदर आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या महिनाभरापूर्वी १६ हजार ७०७ होती. त्यात अवघ्या महिनाभरात ९ हजार ४९८ नव्या रुग्णांची भर पडली.

-----

असा आहे मृत्यूदर

राज्य-२.६ टक्के

औरंगाबाद जिल्हा-२.३ टक्के

खुलताबाद-४.१ टक्के

सिल्लोड-३.७ टक्के

फुलंब्री-३.४ टक्के ,

कन्नड-३.० टक्के