शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

औरंगाबादेतील ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही मागे टाकले आहे. ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही मागे टाकले आहे. या चारही तालुक्यांचा मृत्यू दर औरंगाबाद जिल्हा आणि राज्यापेक्षाही अधिक आहे. या चारही तालुक्यांतील मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.

औरंगाबादेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा एकप्रकारे विस्फोट झाला. दररोज एक ते दीड हजारांच्या घरात नव्या रुग्णांचे निदान हाेत गेले. त्यात ग्रामीण भागांतही रोज पाचशेच्या जवळपास रुग्णांची भर पडत गेली. याबरोबर २० ते ३० च्या संख्येत दररोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात ग्रामीण भागांतील रुग्णांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागांतून थेट शहरात उपचारासाठी येण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. त्यातही गंभीर रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत घाटी, जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मृत्यूचा धोका वाढत आहे.

ग्रामीण भागात आतापर्यंत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १४१ रुग्णांचा गेल्या महिनाभरातच कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या चार तालुक्यांचा मृत्यूदर राज्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोना स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर

जिल्ह्यातील ९ तालुक्यांत औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर आहे. औरंगाबाद तालुक्याचा १.० टक्के एवढा मृत्यूदर आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या महिनाभरापूर्वी १६ हजार ७०७ होती. त्यात अवघ्या महिनाभरात ९ हजार ४९८ नव्या रुग्णांची भर पडली.

-----

असा आहे मृत्यूदर

राज्य-२.६ टक्के

औरंगाबाद जिल्हा-२.३ टक्के

खुलताबाद-४.१ टक्के

सिल्लोड-३.७ टक्के

फुलंब्री-३.४ टक्के ,

कन्नड-३.० टक्के