शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

शहरातील ४ टक्के पाणी नमुने दूषित

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते.

 औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते. गेल्या महिन्यात प्रयोगशाळेने केलेल्या पाणी तपासणीमध्ये औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डांमधील ४ टक्के पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील कन्नड शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यातील २८ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. छावणी परिसरातील निजाम बंगला येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रादेशिक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत औरंगाबादसह जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी, बोअरवेल आणि नळाच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी केली जाते. मानवाला सर्वाधिक आजार दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याचा धोका असतो. तसेच काही जलसाठ्यात रासायनिक अंश आढळतात. काही पाण्यात आयोडिनचे प्रमाण कमी आढळते. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने औरंगाबाद शहरासह वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पाचोड या ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील पेयजल नमुन्याची तपासणी केली जाते. निजाम बंगला येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरासह सर्व तालुक्यांच्या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळाद्वारे दिल्या जाणार्‍या नमुन्यांची तपासणी केली जाते. याविषयी प्रभारी प्रादेशिक अधिकारी एस. व्ही. पत्की यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरातील पाणी काही भागात दूषित असल्याचे निदर्शनास आले. कन्नड नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पैकी ५ नमुने दूषित आढळले आहेत. खुलताबाद नगर परिषदेने ३० नमुन्यांची तपासणी केली. मात्र, हे सर्व नमुने उत्कृष्ट आढळले. पैठण नगर परिषदेच्या हद्दीत ११ पैकी १ पाण्याचा नमुना दूषित होता. तर वैजापूर नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पाणी नमुन्यांपैकी १ नमुना दूषित होता. याबाबतचा अहवाल नगर परिषद आणि संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना पाठविण्यात आला होता. औरंगाबाद मनपाची जलशुद्धीकरणाची प्रक्रिया उत्कृ ष्ट आहे. केवळ पाण्याच्या टाकीपासून ते नागरिकांच्या नळापर्यंत जाणार्‍या पाईपलाईनमध्ये गळती असेल तरच पाणी दूषित होते. २८ नमुने दूषित औरंगाबाद मनपाच्या विविध वॉर्ड ‘अ’ आणि वॉर्ड ‘ड’, वॉर्ड ‘ब’ आणि वॉर्ड ‘क’, वॉर्ड ‘ई’ आणि वॉर्ड ‘फ’ मधून प्रत्येकी पाच नमुने, असे ३० नमुने तपासणीसाठी येतात. गेल्या महिन्यात मनपाकडून ६५३ पाणी नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २८ नमुने दूषित आढळले.