शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ४ टक्के पाणी नमुने दूषित

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते.

 औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते. गेल्या महिन्यात प्रयोगशाळेने केलेल्या पाणी तपासणीमध्ये औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डांमधील ४ टक्के पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील कन्नड शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यातील २८ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. छावणी परिसरातील निजाम बंगला येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रादेशिक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत औरंगाबादसह जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी, बोअरवेल आणि नळाच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी केली जाते. मानवाला सर्वाधिक आजार दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याचा धोका असतो. तसेच काही जलसाठ्यात रासायनिक अंश आढळतात. काही पाण्यात आयोडिनचे प्रमाण कमी आढळते. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने औरंगाबाद शहरासह वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पाचोड या ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील पेयजल नमुन्याची तपासणी केली जाते. निजाम बंगला येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरासह सर्व तालुक्यांच्या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळाद्वारे दिल्या जाणार्‍या नमुन्यांची तपासणी केली जाते. याविषयी प्रभारी प्रादेशिक अधिकारी एस. व्ही. पत्की यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरातील पाणी काही भागात दूषित असल्याचे निदर्शनास आले. कन्नड नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पैकी ५ नमुने दूषित आढळले आहेत. खुलताबाद नगर परिषदेने ३० नमुन्यांची तपासणी केली. मात्र, हे सर्व नमुने उत्कृष्ट आढळले. पैठण नगर परिषदेच्या हद्दीत ११ पैकी १ पाण्याचा नमुना दूषित होता. तर वैजापूर नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पाणी नमुन्यांपैकी १ नमुना दूषित होता. याबाबतचा अहवाल नगर परिषद आणि संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना पाठविण्यात आला होता. औरंगाबाद मनपाची जलशुद्धीकरणाची प्रक्रिया उत्कृ ष्ट आहे. केवळ पाण्याच्या टाकीपासून ते नागरिकांच्या नळापर्यंत जाणार्‍या पाईपलाईनमध्ये गळती असेल तरच पाणी दूषित होते. २८ नमुने दूषित औरंगाबाद मनपाच्या विविध वॉर्ड ‘अ’ आणि वॉर्ड ‘ड’, वॉर्ड ‘ब’ आणि वॉर्ड ‘क’, वॉर्ड ‘ई’ आणि वॉर्ड ‘फ’ मधून प्रत्येकी पाच नमुने, असे ३० नमुने तपासणीसाठी येतात. गेल्या महिन्यात मनपाकडून ६५३ पाणी नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २८ नमुने दूषित आढळले.