शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

३८४ ग्रामपंचायती पात्र

By admin | Updated: July 26, 2014 01:08 IST

नांदेड: पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातील ३८४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

नांदेड: पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये जिल्ह्यातील ३८४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.सन २०१०-११ या वर्षापासून पर्यावरण संतुलित समृद्ध योजना सुरु केली असून ग्रामपंचायतींना लोकसंख्यानिहाय तीन वर्षापर्यंत निधी मिळते. यासंदर्भात ठरवून दिलेले वृक्ष लागवड, निर्मल भारत अभियान, कर वसुली, प्रदुषण, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, यशवंत पंचायतराज अभियान, अपारंपारिक उर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व ई-पंचायत आदी निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्याआधारे दरवर्षी २ ते १० लाख रुपयापर्यंत निधी दिला जातो. यात १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १० लाख व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्यांना १२ लाख दरवर्षी दिले जातात. ७००१ ते १० हजार लोकसंख्येपर्यंत ८ लाख, ५००१ ते ७ हजार लोकसंख्या ८ लाख, २००१ ते ५ हजार ४ लाख, १००१ ते २ हजार ३ लाख तर एक हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना दरवर्षी २ लाख रुपये निधी देण्यात येतो.उर्वरित शिल्लक ग्रामपंचायतीमधून २०१३-१४ साठी पात्र होऊ शकणाऱ्या ग्रामपंचायती अशा- पहिल्या वर्षासाठी २७५, दुसऱ्या वर्षासाठी १६४ तर तिसऱ्या वर्षासाठी ३४ अशा एकूण ४७३ ग्रामपंचायती असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमावाड यांनी सांगितले. एकूण पहिल्या वर्षासाठी ६२१ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत.एकूण ग्रामपंचायतीपैकी ६८८ ग्रामपंचायती या योजनेत पात्र होऊ शकल्या नाहीत. या योजनेतंर्गत विकासरत्न पुरस्कारासाठी नांदेड तालुक्यातील-बोंढार-नेरली, धर्माबाद-येताळा, लोहा-पळशी, झरी, कंधार-मजरे धर्मापूरी या पाच ग्रामपंचायतीचे विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती.पात्र ठरलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे जिल्ह्यात एकूण १३०९ ग्रामपंचायती असून यापैकी पहिल्या वर्षासाठी ३४६, दुसऱ्या वर्षासाठी २७ तर तिसऱ्या वर्षासाठी ११ अशा मार्च २०१३ अखेर ३८४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत.यात नांदेड तालुक्यातील २९, अर्धापूर १९, मुदखेड २९, भोकर १६, उमरी ४६, हदगांव ३३, हिमायतनगर २१, किनवट ४, माहूर ९, नायगांव २३, बिलोली ९, धर्माबाद २१, मुखेड ४२, देगलूर २१, लोहा २१ तर कंधार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.