शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

३७७३ रुग्णांना लाभ

By admin | Updated: August 17, 2014 01:42 IST

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ३०८ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर आतापर्यंत ३ हजार ७७३ उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या उपचारावर शासनाने आतापर्यंत १० कोटी ७४ लाख ४ हजार १५ रुपये खर्च केले आहेत.कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गतवर्षीपासून महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक लाखापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. तसेच विविध गंभीर आजारांसाठीही स्वतंत्र पॅकेज देण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयासोबत औरंगाबादेतील २२ खाजगी रुग्णालयातही उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णास केवळ रेशनकार्ड अथवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागते. या कागदपत्राच्या आधारे सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्यात येतात. अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात सर्वाधिक ३९६ कुटुंबांतील ५०५ जणांवर शस्त्रक्रिया उपचार करण्यात आलेल्या त्यासाठी जीवनदायी योजना राबविणाऱ्या संस्थेकडून त्यांना २ कोटी ४० लाख ६२ हजार ७५० रुपये प्राप्त झाले आहेत. कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४८५ कुटुंबांतील ८७४ रुग्णांवर उपचार झाले. त्यासाठी या रुग्णालयास २ कोटी ५७ लाख ८ हजार ८०० रुपये मिळाले. घाटी रुग्णालयात यावर्षी आतापर्यंत ८४२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर शासकीय कॅन्सर रुग्णालयात १४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या उपचाराच्या खर्चापोटी रुग्णालयांना अनुक्रमे ११ लाख ८ हजार रुपये आणि १ कोटी ३८ लाख ६ हजार ३८५ रुपये प्राप्त झाले आहेत. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्येही सुमारे ४४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी त्यांना १ कोटी ५९ लाख ४४ हजार २४० रुपये उपचाराचा खर्च म्हणून प्राप्त झाला आहे.