शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

३७७३ रुग्णांना लाभ

By admin | Updated: August 17, 2014 01:42 IST

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ३०८ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर आतापर्यंत ३ हजार ७७३ उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या उपचारावर शासनाने आतापर्यंत १० कोटी ७४ लाख ४ हजार १५ रुपये खर्च केले आहेत.कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गतवर्षीपासून महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक लाखापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. तसेच विविध गंभीर आजारांसाठीही स्वतंत्र पॅकेज देण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयासोबत औरंगाबादेतील २२ खाजगी रुग्णालयातही उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णास केवळ रेशनकार्ड अथवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागते. या कागदपत्राच्या आधारे सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्यात येतात. अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात सर्वाधिक ३९६ कुटुंबांतील ५०५ जणांवर शस्त्रक्रिया उपचार करण्यात आलेल्या त्यासाठी जीवनदायी योजना राबविणाऱ्या संस्थेकडून त्यांना २ कोटी ४० लाख ६२ हजार ७५० रुपये प्राप्त झाले आहेत. कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४८५ कुटुंबांतील ८७४ रुग्णांवर उपचार झाले. त्यासाठी या रुग्णालयास २ कोटी ५७ लाख ८ हजार ८०० रुपये मिळाले. घाटी रुग्णालयात यावर्षी आतापर्यंत ८४२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर शासकीय कॅन्सर रुग्णालयात १४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या उपचाराच्या खर्चापोटी रुग्णालयांना अनुक्रमे ११ लाख ८ हजार रुपये आणि १ कोटी ३८ लाख ६ हजार ३८५ रुपये प्राप्त झाले आहेत. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्येही सुमारे ४४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी त्यांना १ कोटी ५९ लाख ४४ हजार २४० रुपये उपचाराचा खर्च म्हणून प्राप्त झाला आहे.