शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

गटामध्ये ३६ तर गणात ६८ उमेदवार

By admin | Updated: February 8, 2017 00:19 IST

कळंब : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ३६ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत़

कळंब : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ३६ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत़ तर चोराखळी गणातील उमेदवारांच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत १० फेब्रुवारी रोजी अंतीम निर्णय होणार आहे़ नायगाव गटातून राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली तर ईटकूर गटात सेनेत बंडखोरी झाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटांसाठी आता बहुतांश ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत़ उमेदवारी मागे घेण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांना पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी या नेत्यांना यश आले तर काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्या ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अडचण येणार आहे. ईटकूर गटात सेनेच्या दोन वेळेसच्या जिल्हा परिषद सदस्या पंचफुला मधुकर सावंत यांना सेनेने उमेदवारी नाकारली. मधुकर सावंत हे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी रिपाइं (आठवले गट) मधून सेनेत नुकताच प्रवेश केलेले कालिदास सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. पंचफुला सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. डिकसळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार पद्मजा निळकंठ शिंदे यांनीही उमेदवारी मागे घेतली. या गटात आता सेना, राष्ट्रवादी व भाजपा पुरस्कृत उमेदवारांत लढत रंगणार आहे. शिंदे यांची उमेदवारी मागे घेण्यामागे काँग्रेसच्याच एका गटाचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याव्यतिरिक्त ईटकूर गणातील प्रांजली आडसूळ, मंगरूळ गणातील विद्या जाधव, हासेगाव (केज) गणातील हरिश्चंद्र कुंभार या काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसला आता ईटकूर व डिकसळ गटात तसेच मस्सा (खं), ईटकूर, मंगरूळ, हासेगाव (केज), लोहटा (पूर्व) या पाच गणात उमेदवारच नाहीत.