शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:27 IST

जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले

जालना : जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले. यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जालना कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये अनेक कृषिसेवा केंद्रांवर कीटकनाशक विक्रीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने शेतक-यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान हाती घेतले होते. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते व शेतक-यांच्या कार्यशाळा घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली होती. या अभियानामध्ये कृषिसेवा केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीच्या सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषिविकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत जिल्ह्यातील कृषि केंद्रांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये सुमारे १२०० कृषी केंद्रांतील कीटकनाशके, खरेदी-विक्रीच्या नोंदवह्या, दर फलक, अतिजहाल कीटकनाशके यांची तपासणी करण्यात आली. पैकी पाचशे दुकाने वर्षभर तर अन्य दुकाने खरीप हंगामात सुरू राहणारी आहेत. या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाने तब्बल ३६ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भोकरदन, अंबड आणि जालना येथील कृषीकेंद्रांची संख्या अधिक आहे. बदनापूर आणि परतूर तालुक्यातील कृषिकेंद्रांवर कीटकनाशक विक्री नियमांची बºयापैकी अंमलबजावणी होत असल्याने या तालुक्यांतील एकाही केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.-------------५० कृषिकेंद्र चालकांना नोटिसातपासणीमध्ये कृषी विभागाने विषारी, अतिविषारी कीटकनाशकांचा साठा तपासला . यात कीटकनाशकांच्या बाटलीवरील लाल रंगाचा त्रिकोण असलेल्या प्रतिबंधित अतिजहाल कीटकनाशकांचा साठाही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने ५० कृषिसेवा केंद्रांना आपला परवाना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावली असून, कीटकनाशक विक्रीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे.