शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:27 IST

जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले

जालना : जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले. यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जालना कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये अनेक कृषिसेवा केंद्रांवर कीटकनाशक विक्रीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने शेतक-यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान हाती घेतले होते. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते व शेतक-यांच्या कार्यशाळा घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली होती. या अभियानामध्ये कृषिसेवा केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीच्या सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषिविकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत जिल्ह्यातील कृषि केंद्रांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये सुमारे १२०० कृषी केंद्रांतील कीटकनाशके, खरेदी-विक्रीच्या नोंदवह्या, दर फलक, अतिजहाल कीटकनाशके यांची तपासणी करण्यात आली. पैकी पाचशे दुकाने वर्षभर तर अन्य दुकाने खरीप हंगामात सुरू राहणारी आहेत. या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाने तब्बल ३६ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भोकरदन, अंबड आणि जालना येथील कृषीकेंद्रांची संख्या अधिक आहे. बदनापूर आणि परतूर तालुक्यातील कृषिकेंद्रांवर कीटकनाशक विक्री नियमांची बºयापैकी अंमलबजावणी होत असल्याने या तालुक्यांतील एकाही केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.-------------५० कृषिकेंद्र चालकांना नोटिसातपासणीमध्ये कृषी विभागाने विषारी, अतिविषारी कीटकनाशकांचा साठा तपासला . यात कीटकनाशकांच्या बाटलीवरील लाल रंगाचा त्रिकोण असलेल्या प्रतिबंधित अतिजहाल कीटकनाशकांचा साठाही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने ५० कृषिसेवा केंद्रांना आपला परवाना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावली असून, कीटकनाशक विक्रीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे.