शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:27 IST

जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले

जालना : जिल्ह्यातील ३६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने मंगळवारी निलंबित केले. यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जालना कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये अनेक कृषिसेवा केंद्रांवर कीटकनाशक विक्रीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने शेतक-यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान हाती घेतले होते. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते व शेतक-यांच्या कार्यशाळा घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली होती. या अभियानामध्ये कृषिसेवा केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीच्या सर्व नियमांचे काटकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषिविकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत जिल्ह्यातील कृषि केंद्रांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये सुमारे १२०० कृषी केंद्रांतील कीटकनाशके, खरेदी-विक्रीच्या नोंदवह्या, दर फलक, अतिजहाल कीटकनाशके यांची तपासणी करण्यात आली. पैकी पाचशे दुकाने वर्षभर तर अन्य दुकाने खरीप हंगामात सुरू राहणारी आहेत. या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाने तब्बल ३६ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये भोकरदन, अंबड आणि जालना येथील कृषीकेंद्रांची संख्या अधिक आहे. बदनापूर आणि परतूर तालुक्यातील कृषिकेंद्रांवर कीटकनाशक विक्री नियमांची बºयापैकी अंमलबजावणी होत असल्याने या तालुक्यांतील एकाही केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.-------------५० कृषिकेंद्र चालकांना नोटिसातपासणीमध्ये कृषी विभागाने विषारी, अतिविषारी कीटकनाशकांचा साठा तपासला . यात कीटकनाशकांच्या बाटलीवरील लाल रंगाचा त्रिकोण असलेल्या प्रतिबंधित अतिजहाल कीटकनाशकांचा साठाही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने ५० कृषिसेवा केंद्रांना आपला परवाना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावली असून, कीटकनाशक विक्रीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे.