शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पर्ल्समध्ये लातूरकरांचे ३५० कोटी ?

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

चेतन धनुरे/बाळासाहेब जाधव ल्ल उदगीर/लातूर चेन मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उभी करणाऱ्या पर्ल्स या कंपनीकडून परतावा मिळणे थांबल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़

चेतन धनुरे/बाळासाहेब जाधव ल्ल उदगीर/लातूरचेन मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उभी करणाऱ्या पर्ल्स या कंपनीकडून परतावा मिळणे थांबल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ लातूर जिल्ह्यातून साडेतीनशे कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाल्याचे पुढे आले आहे. सेबीच्या कारवाईनंतर आलेल्या वृत्तांमुळे जिल्हाभरातील गुंतवणूकदार हादरले आहेत. त्यांनी एजंटकडे पैशाचा तगादा लावल्याने एजंट चांगलेच हैराण झाले आहेत. गेल्या सोळा वर्षांपूर्वीपासून लातूर, औसा, चाकूर, रेणापूर, निलंगा उदगीर व देवणी भागात पर्ल्सची चेन मार्केटिंग सुरु झाली़ याच भागातील काही लोकांनी सुरुवातीला एजंटांचे जाळे विणत मोठमोठ्या परताव्याचा दावा करुन गुंतवणूकदारांचा ओढा पर्ल्सकडे वळविला़ वेगवेगळ्या आकर्षक योजनांद्वारे नागरिकांना या एजंटांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक करायला लावली़ बघता-बघता या भागातील एजंटांची संख्या संख्या हजारावर गेली आहे़ त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्याही वाढून कोट्यवधी रुपये कंपनीत गुंतविले गेले आहेत़ देवणी तालुक्यातील विजयनगर व दवणहिप्परगा येथील मुख्य एजंटांनी त्यांच्याखाली लहान एजंट तयार केले आहेत़ या एजंटांची संख्या हजारावर असल्याची माहिती मिळाली आहे़ विजयनगरचे बोरुळे व दवणहिप्परग्याचे राम टिळे हे या भागातील समुपदेशक आहेत़ त्यांनी चेन वाढवून एजंटांद्वारे कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणली़ नजिकच्या काळापर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळत गेला़ मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा परतावा मिळणे थांबले आहे़ गुंतवणूकदारांमध्ये राजकीय नेत्यांपासून शिक्षक, नोकरदार, कर्मचारी, मजूरदार, शेतकरी, महिला असा प्रत्येक घटक समाविष्ट आहे़लातूर जिल्ह्यात पर्ल्स एजंटांची संख्या मोठी आहे़ महिन्याला ५० हजाराचा भरणा करणाऱ्या एजंटांना चार टक्के कमिशन आहे. ५० हजार जमा करणाऱ्याच्या खिशात २ हजार रुपये जात होते़ त्यामुळे एजंट अधिकाधिक पैसे गोळा करण्यासाठी दिवसारात्र काम करायचे विशेष यामध्ये गुंतवणूक वाढत जाईल तसा एजंटाचाही दर्जा वाढत जायचा़ एजंटाचा फिल्ड आॅफिसर, त्यानंतर आॅर्गनायझर असे प्रमोशनही देण्यात येत असल्याने एजंटाच्या संखेत मोठी वाढ झाली़ परिणामी त्यांनी आपल्या नातेवाईकासह मित्रांनाही गुंतवणूक करण्यात भाग पाडले़ परंतु आजच्या परिस्थित त्या कंपनीची चौकशी होत एसआयटी मार्फत चौकशी होत असल्याने गुंतवणूकदाराबरोबरच एजंटही अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात या संस्थेचे २० हजारांहून अधिक एजंट आहेत. त्यात ग्रामीण भागातील महिलांचा मोठा समावेश आहे. सेबीच्या कारवाईच्या बातम्या येताच या साऱ्या एजंटांच्या मागे गुंतवणूकदारांनी तगादा लावला आहे. हा इतका भयानक आहे की अनेक एजंटांनी आपले भ्रमणध्वनी स्विच आॅफ केले आहेत. त्यामुळे गैरसमजात आणखी भर पडत असून गुंतवणूकदार त्यांच्या दारावर लोंढ्याने जात आहेत. शेजमजुरांनीही गुंतविले पैसे४गुंतवणुकीच्या आमिषाने चाकूर तालुक्यातील अलगरवाडी या चाकूर तालुक्यातील दोन अडीचशे कुटुंबाच्या गावात ९० टक्के पल्समध्ये पैसे गुंतविलेले लोक आहेत. या गावातील करुबाई केंगार ही मोजमजुरी करणारी महिला पैसे बुडणार की काय विचाराने अस्वस्थ आहे. अशीच अवस्था सखुबाई गेडमे या हातावर पोट असलेल्या महिलेची झाली आहे. कंपनीची सेबी व सीबीआयकडून चौकशी सुरु असल्याने खाते गोठविण्यात आले आहेत़ त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येत नसल्याने तूर्तास परतावा थांबला आहे़ चौकशी समितीने परवानगी दिल्यास त्वरीत परतावा मिळणार आहे़ गुंतवणूकदारांच्या रकमेच्या सहापट मालमत्ता कंपनीकडे असल्याचा दावा करुन प्रत्येक गुंतवणूकदाराची रक्कम परत मिळेल, असे स्पष्टीकरण समुपदेशक राम टिळे, एजंट बालाजी वळसांगवीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले़ याबाबत आदर्श मैत्री फौंडेशनचे संतोष बिराजदार यांनी गुंतवणूकदारांचे संघटन करुन प्रत्येकाचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कोणतेही शुल्क न भरता गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन संघटीतपणे लढा दिल्यास गुंतविलेले पैसे आणण्यासाठी रचनात्मक लढाईसाठी एकत्रे यावे, असे आवाहनही संतोष बिराजदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.उदगीर तालुक्यातील कुमठा बु़ येथील रहिवासी असलेले श्रीरंग तलवारे हे रेल्वे खात्यात नोकरीस होते़ ते काही वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले आहेत़ त्यांना मिळालेल्या पेन्शनच्या रकमेपैकी २ लाख ५० हजार रुपये त्यांनी पर्ल्समध्ये गुंतविले़ मात्र आता परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना एजंटाकडे खेटे मारावे लागत आहेत़ वृद्धत्वातील आधारच अडकला असल्याची प्रतिक्रिया त्यांचे जावई राजकुमार कांबळे यांनी दिली़ एकुर्का येथील चालक ज्ञानोबा जाधव यांनीही १ लाख रुपये गुंतविले आहेत़