शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

३५० अंगणवाड्यांना मिळेना हक्काचे छत !

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

उस्मानाबाद : बालकांना पक्का निवारा मिळावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही १४७ अंगणवाड्यांची बांधकामे विविध कारणांमुळे रखडली आहेत.

उस्मानाबाद : बालकांना पक्का निवारा मिळावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही १४७ अंगणवाड्यांची बांधकामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. तर दुसरीकडे जागा उपलब्ध होत नसल्याने २०० अंगणवाड्यांचे इमारत बांधकाम अडचणीत सापडले आहे. एकंदरीत जिल्ह््यातील ३५० अंगणवाड्यांना त्यांच्या हक्काचे छत अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे या गावातील बालकांना समाजमंदिरामध्ये अथवा मंदिरात बसविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.जिल्ह््यामध्ये १० प्रकल्पांतर्गत सुमारे १ हजार ८७६ अंगणवाड्या सुरु आहेत. या अंगणवाड्यांमधून लाखो बालके ज्ञानाचे धडे गिरवत आहे. एकीकडे अंगणवाड्या डिजिटल करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. तर दुसरी हजारो बालकांना बसण्यासाठी पक्की इमारत नाही. उपलब्ध होईल त्या इमारतीमध्ये बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहे. इमारतीची समस्या लक्षात घेऊन मागील दोन-तीन वर्षामध्ये शासनाकडून बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे जवळपास १४७ इमारतींची बांधकामे रखडली आहेत. पाणी नसल्यामुळे काही इमारतीची बांधकामे झाली नाहीत, असे सांगण्यात आले. काही ठिकाणी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही इमारतीचा निधी आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या जिल्हा बँकेत अडकला आहे. त्यामुळे या १४७ अंगणवाड्यांच्या बालकांना मिळेल त्या इमारतीत बसावे लागत आहे.दरम्यान, २०० वर गावे अशी आहेत की, जेथे अंगणवाडीसाठी जागा मिळत नाही. गावामधील गावठाण जमिनी बक्कळ असतात. असे असतानाही अंगणवाडीसाठी जागा मिळत ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे. त्यामुळे या मुलांनाही बसण्यासाठी समाजमंदिरे अथवा भाड्याच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे. १४७ अंगणवाड्यांची कामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)कुपोषणमुक्तीवर परिणामशासनाच्या वतीने कुपोषणमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम अंगणवाडीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. मात्र ३५० अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्यामुळे संबंधित अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. परिणामी त्यांना हे उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविता येत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. याचाच परिणाम कुपोषण मुक्तगाव यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमावर होत असल्याचेही नमूद केले.लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज२०० वर गावांमध्ये अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे या गावातील बालकांना भाड्याच्या इमारतीत अथवा समाजमंदिरामध्ये बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यानंतर मार्गी लागू शकतो. असे झाल्यास २०० वर गावांमध्ये अंगणवाड्यांच्या इमारती उभा राहू शकतात.