शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 20, 2014 23:34 IST

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक पोलिसांनी १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करीत तब्बल ३५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यांना धाक रहावा म्हणून वाहतूक पोलीस नेहमीच त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावत असतात़ त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विरूध्द दिशेने येणे, चौकामध्ये वाहन उभे करणे, परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट गाडी चालविणे, वाहनाची कागदपत्रे न बाळगणे, चालत्या वाहनावरून मोबाईलवर बोलणे, रहदारीस अडथळा यासह अनेक बाबींचा समावेश आहे़ वाहतूक पोलिसांच्या वतीने मांजरसुंबा ते गेवराई महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकाची तपासणी करण्यात आली़ तो मद्य पिऊन वाहन चालवित असल्याचे समोर आल्यास त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत न्यायालयात दाखल करण्यात येते़ त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात येतो़ यासह सिग्नल तोडून पळून जाणारे किंवा विना परवाना वाहन चालविणाऱ्यांना वाहतूक पोलीस पावती फाडून दंड वसूल करतात़ वर्षभराच्या कालावधीत ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ हा आकडा नोव्हेंबरअखेरचा असल्याची माहिती पोलिस प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ गेल्या वर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत ३२ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ यात यावर्षी ३ लाख रूपयांची वाढ झाली आहे़ वारंवार कारवाया होत असल्याने वाहनधारकांनी धसका घेतला आहे़ परंतु कळत नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होतच असते़ दंड देऊनही नियमांचे उल्लंघन होत आहे़अधीक्षकांनी दिल्या सूचनावाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केल्या आहेत़ तसेच कारवाई करताना कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले आहे़ वाहन पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती नेते मंडळींना फोन लावतात़ त्यामुळे वाहतूक पोलिसांवर दबाव निर्माण होतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर कराच, अडथळा आणणाऱ्यावरही कारवाई करण्याचे सांगितले आहे़ (प्रतिनिधी)४२०१३ या वर्षांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ५६० वाहनांधारकांवर कारवाया करण्यात आल्या़४त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़४नोव्हेंबर २०१४ पर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़