शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 20, 2014 23:34 IST

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक पोलिसांनी १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करीत तब्बल ३५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यांना धाक रहावा म्हणून वाहतूक पोलीस नेहमीच त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावत असतात़ त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विरूध्द दिशेने येणे, चौकामध्ये वाहन उभे करणे, परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट गाडी चालविणे, वाहनाची कागदपत्रे न बाळगणे, चालत्या वाहनावरून मोबाईलवर बोलणे, रहदारीस अडथळा यासह अनेक बाबींचा समावेश आहे़ वाहतूक पोलिसांच्या वतीने मांजरसुंबा ते गेवराई महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकाची तपासणी करण्यात आली़ तो मद्य पिऊन वाहन चालवित असल्याचे समोर आल्यास त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत न्यायालयात दाखल करण्यात येते़ त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात येतो़ यासह सिग्नल तोडून पळून जाणारे किंवा विना परवाना वाहन चालविणाऱ्यांना वाहतूक पोलीस पावती फाडून दंड वसूल करतात़ वर्षभराच्या कालावधीत ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ हा आकडा नोव्हेंबरअखेरचा असल्याची माहिती पोलिस प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ गेल्या वर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत ३२ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ यात यावर्षी ३ लाख रूपयांची वाढ झाली आहे़ वारंवार कारवाया होत असल्याने वाहनधारकांनी धसका घेतला आहे़ परंतु कळत नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होतच असते़ दंड देऊनही नियमांचे उल्लंघन होत आहे़अधीक्षकांनी दिल्या सूचनावाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केल्या आहेत़ तसेच कारवाई करताना कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले आहे़ वाहन पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती नेते मंडळींना फोन लावतात़ त्यामुळे वाहतूक पोलिसांवर दबाव निर्माण होतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर कराच, अडथळा आणणाऱ्यावरही कारवाई करण्याचे सांगितले आहे़ (प्रतिनिधी)४२०१३ या वर्षांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ५६० वाहनांधारकांवर कारवाया करण्यात आल्या़४त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़४नोव्हेंबर २०१४ पर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़