शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

३२ गावांचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: May 20, 2014 01:09 IST

सखाराम शिंदे, गेवराई गोदावरी नदीला महापूर आल्यास गोदकाठच्या अनेक गावांना पाण्याचा विळखा पडतो. यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

सखाराम शिंदे,  गेवराई गोदावरी नदीला महापूर आल्यास गोदकाठच्या अनेक गावांना पाण्याचा विळखा पडतो. यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे पुनर्वसन रखडले आहे. आता पावसाळा तोंडावर येताच पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनपासून तलवाड्यापर्यंतची अनेक गावे गोदावरीच्या काठी वसलेली आहेत. २००६ व २००७ मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पैठण येथील नाथसागरही तुडुंब भरले होते. त्यावेळी गोदावरी नदीपत्रात पाणी सोडण्यात आले होते. धरणातून सोडलेले पाणी व पडत्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील रामपुरी, बोरगाव, भोगलगाव, कुरणींिपंप्री, पांचाळेश्वर, सावळेश्वर, राहेरी, राजापूर, राक्षसभुवन, आगरनांदुर अशा अनेक गावांना पुराचा वेढा पडला होता. नदीला आलेला पूर व गावांना पडलेला पुराचा वेढा यामुळे अनेकांना गाव सोडून स्थलांतर करावे लागले. पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. तसेच शेतातील पिकेही वाहून गेली. यामुळे ग्रामस्थांवर आसमानी संकट ओढावले होते. यामुळे अनेक गावेच्या गावे स्थलांतरीत करण्यात आली होती. या नैसर्गिक आपत्तीकाळात आपद्ग्रस्तांना आमदार, मंत्री तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाने भेटी दिल्या होत्या. यावेळी आपद्ग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याच्या घोषणाही करण्यात आल्या होत्या. या पुनर्वसनाच्या घोषणेला आता आठ वर्षे लोटली तरीही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. गोदावरीला पूर आला की, या परिसरातील ग्रामस्थांच्या समस्यांमध्ये वाढ होते. पुनर्वसन होत नसल्याने ग्रामस्थांच्या जिवाला धोका कायमच आहे. मात्र याची ना महसूल प्रशासन दखल घेते ना लोकप्रतिनिधींना चिंता वाटते. पुनर्वसनासाठी २००९ मध्ये ३२ गावांचे पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. यावरही अद्याप काहीच कारवाई न झाल्याने गोदाकाठच्या नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले, ३२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून पाठपुरावा सुरू आहे.