शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

३२ गावांना ‘शॉक’

By admin | Published: March 24, 2017 12:05 AM

बीड मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे.

राजेश खराडे बीडमार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे. वसुलीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना मंडळातील जवळपास ३२ गावांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असून, हजारो ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आक्रमक पवित्रा राबवूनही सरासरीएवढी वसुली दृष्टिक्षेपात दिसत नाही.लातूर परिमंडळात बीड मंडळाकडे सर्वाधिक थकबाकी आहे. कृषी पंपग्राहक सोडता ४०० कोटी थकबाकी इतर ग्राहकांकडे असून, वरिष्ठ कार्यालयाकडून ९४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट मंडळास देण्यात आले आहे. महिन्याच्या सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या दारी जाऊन सरासरी एवढी वसुली करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ग्राहकांची उदासीनता पाहून अधीक्षक अभियंत्यांसह सर्वांना या मोहिमेत झोकून द्यावे लागत आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठा, पथदिवे या शासकीय कार्यालयांकडेही कोटीची थकबाकी आहे. वरिष्ठांचा दबाव व मंडळाची प्रतिमा डागाळत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार बीड विभागातील शिरूर तालुक्यातील बावी, आनंदगाव येथील वीज पुरवठा खंडित केला असून, नादुरुस्त रोहित्र तसेच ठेवण्यात आले आहेत.गेवराई उपविभागाकडे सर्वाधिक थकबाकी असून, ११ गावांची वीज तोडण्यात आली असून, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटींची थकबाकी आहे. पाटोदा तालुक्यातील ४ वाड्या-वस्त्यांवरील वीज बंद करून १२ ठिकाणचा पाणीपुरवठाही बंद केला गेला आहे. १२०० ग्राहकांकडे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित केला आहे.आष्टी तालुक्यातील काटेवडगाव, खिळद, पोयाल, खडकत या गावांची वीज गेल्या आठ दिवसांपासून बंद असून, या गावांकडे ४० रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणने कडक मोहीम राबवूनदेखील ग्राहकांची वीज बिले भरण्याविषयी उदासीनता दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्राहकांच्या भेटीवर भर दिला असून, शासकीय कार्यालयाच्या दरबारीही वसुलीसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अंबाजोगाई विभागातील लऊळ-२, एकबुर्जी, लोनवळ, मोहपूल तांडा, गायके वस्ती, तिगाव तांडा, खरवत लिंबगाव, निमला, मोठेवाडी, सिंगनवाडी, बोडखा, साळेगाव, कोथळा, महातारगाव आदी गावे थकबाकीमुळे अंधारात आहेत. तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या हजारांवर आहे.