शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

३२ गावांना ‘शॉक’

By admin | Updated: March 24, 2017 00:06 IST

बीड मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे.

राजेश खराडे बीडमार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे. वसुलीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना मंडळातील जवळपास ३२ गावांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असून, हजारो ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आक्रमक पवित्रा राबवूनही सरासरीएवढी वसुली दृष्टिक्षेपात दिसत नाही.लातूर परिमंडळात बीड मंडळाकडे सर्वाधिक थकबाकी आहे. कृषी पंपग्राहक सोडता ४०० कोटी थकबाकी इतर ग्राहकांकडे असून, वरिष्ठ कार्यालयाकडून ९४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट मंडळास देण्यात आले आहे. महिन्याच्या सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या दारी जाऊन सरासरी एवढी वसुली करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ग्राहकांची उदासीनता पाहून अधीक्षक अभियंत्यांसह सर्वांना या मोहिमेत झोकून द्यावे लागत आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठा, पथदिवे या शासकीय कार्यालयांकडेही कोटीची थकबाकी आहे. वरिष्ठांचा दबाव व मंडळाची प्रतिमा डागाळत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार बीड विभागातील शिरूर तालुक्यातील बावी, आनंदगाव येथील वीज पुरवठा खंडित केला असून, नादुरुस्त रोहित्र तसेच ठेवण्यात आले आहेत.गेवराई उपविभागाकडे सर्वाधिक थकबाकी असून, ११ गावांची वीज तोडण्यात आली असून, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटींची थकबाकी आहे. पाटोदा तालुक्यातील ४ वाड्या-वस्त्यांवरील वीज बंद करून १२ ठिकाणचा पाणीपुरवठाही बंद केला गेला आहे. १२०० ग्राहकांकडे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित केला आहे.आष्टी तालुक्यातील काटेवडगाव, खिळद, पोयाल, खडकत या गावांची वीज गेल्या आठ दिवसांपासून बंद असून, या गावांकडे ४० रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणने कडक मोहीम राबवूनदेखील ग्राहकांची वीज बिले भरण्याविषयी उदासीनता दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्राहकांच्या भेटीवर भर दिला असून, शासकीय कार्यालयाच्या दरबारीही वसुलीसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अंबाजोगाई विभागातील लऊळ-२, एकबुर्जी, लोनवळ, मोहपूल तांडा, गायके वस्ती, तिगाव तांडा, खरवत लिंबगाव, निमला, मोठेवाडी, सिंगनवाडी, बोडखा, साळेगाव, कोथळा, महातारगाव आदी गावे थकबाकीमुळे अंधारात आहेत. तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या हजारांवर आहे.