शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

३२ गावांना ‘शॉक’

By admin | Updated: March 24, 2017 00:06 IST

बीड मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे.

राजेश खराडे बीडमार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे. वसुलीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना मंडळातील जवळपास ३२ गावांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असून, हजारो ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आक्रमक पवित्रा राबवूनही सरासरीएवढी वसुली दृष्टिक्षेपात दिसत नाही.लातूर परिमंडळात बीड मंडळाकडे सर्वाधिक थकबाकी आहे. कृषी पंपग्राहक सोडता ४०० कोटी थकबाकी इतर ग्राहकांकडे असून, वरिष्ठ कार्यालयाकडून ९४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट मंडळास देण्यात आले आहे. महिन्याच्या सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या दारी जाऊन सरासरी एवढी वसुली करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ग्राहकांची उदासीनता पाहून अधीक्षक अभियंत्यांसह सर्वांना या मोहिमेत झोकून द्यावे लागत आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठा, पथदिवे या शासकीय कार्यालयांकडेही कोटीची थकबाकी आहे. वरिष्ठांचा दबाव व मंडळाची प्रतिमा डागाळत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार बीड विभागातील शिरूर तालुक्यातील बावी, आनंदगाव येथील वीज पुरवठा खंडित केला असून, नादुरुस्त रोहित्र तसेच ठेवण्यात आले आहेत.गेवराई उपविभागाकडे सर्वाधिक थकबाकी असून, ११ गावांची वीज तोडण्यात आली असून, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटींची थकबाकी आहे. पाटोदा तालुक्यातील ४ वाड्या-वस्त्यांवरील वीज बंद करून १२ ठिकाणचा पाणीपुरवठाही बंद केला गेला आहे. १२०० ग्राहकांकडे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित केला आहे.आष्टी तालुक्यातील काटेवडगाव, खिळद, पोयाल, खडकत या गावांची वीज गेल्या आठ दिवसांपासून बंद असून, या गावांकडे ४० रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणने कडक मोहीम राबवूनदेखील ग्राहकांची वीज बिले भरण्याविषयी उदासीनता दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्राहकांच्या भेटीवर भर दिला असून, शासकीय कार्यालयाच्या दरबारीही वसुलीसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अंबाजोगाई विभागातील लऊळ-२, एकबुर्जी, लोनवळ, मोहपूल तांडा, गायके वस्ती, तिगाव तांडा, खरवत लिंबगाव, निमला, मोठेवाडी, सिंगनवाडी, बोडखा, साळेगाव, कोथळा, महातारगाव आदी गावे थकबाकीमुळे अंधारात आहेत. तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या हजारांवर आहे.