शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांत ३२ टँकर

By admin | Updated: April 16, 2016 23:54 IST

तुळजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, त्याच प्रमाणात टँकरच्या आकडेवारीचा आलेख देखील चढत असल्याचे चित्र आहे.

तीव्रता वाढली : तुळजापूर तालुक्यात १४७ स्त्रोतांचे अधिग्रहणतुळजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, त्याच प्रमाणात टँकरच्या आकडेवारीचा आलेख देखील चढत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील वीस गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ६७ गावे, वाड्या-तांड्यांची तहान १४७ अधिग्रहणावर भागविली जात आहे.गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विहिरी, बोअर, कुपनलिकांचे पाणी देखील आटले असल्याने गावा-गावात पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक ठिकाणी तर टँकर भरण्यासाठी देखील स्त्रोत उपलब्ध नसल्याने या गावांची तहान भागविताना प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्यात टँकर व अधिग्रहणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या ३२ टँकरद्वारे दररोज ११० फेऱ्या केल्या जात असून, यामध्यमातून वीस गावातील ग्रामस्थांची तहान भागत आहे.सद्यस्थितीत तालुक्यातील मंगरूळ, सलगरा (दि), अपसिंगा, खंडाळा, खुदावाडी, कसई, अणदूर, होर्टी, ढेकरी, किलज, जळकोट, भातंब्री, बिजनवाडी, चिंचोली, मसला (खु), माळुंब्रा, खानापूर, चिवरी, वडगाव, आरळी (खु) या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, २७ तांडे-वस्ती व ४० गावांसाठी टँकरव्यतिरिक्त विहीर, बोअर अशा ११४ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे पंचनाम्यासाठी काक्रंबा, बोरनदीवाडी, बोळेगाव, बोरगाव (तु), चिंचोली, निलेगाव, तामलवाडी, हापूर, बारूळ, किलज आणि कार्ला या गावातील १८ अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच तहसील कार्यालयाकडे ३७ प्रस्ताव मंजुरीकडेपाठविण्यात आले आहेत. टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. टँकर तसेच अधिग्रहणासाठी दाखल झालेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी सांगितले. (वार्ताहर) अनेक गावात भटकंती : स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रशासनाचीही होतेय कसरतसव्वादोन कोटी खर्चतालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकर व अधिग्रहणावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. सन २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत टंचाई उपाययोजनांवर २ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, अजूनही पंचायत समितीकडे अधिग्रहण, टँकरसाठीचे अनेक प्रस्ताव दाखल होत आहेत. एका टँकरला एका दिवसाला साधारणत: दीड हजार रुपये याप्रमाणे महिन्याकाठी ४५ हजार म्हणजेच ३२ टँकरसाठी दरमहा १४ लाख ४० हजार रुपये खर्च होत आहेत. टँकरशिवाय अधिग्रहणावर देखील दररोज हजारो रुपये खर्च करण्यात येत आहेत.