शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जायकवाडी प्रकल्पात ३२% गाळ

By admin | Updated: May 24, 2016 01:21 IST

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला.

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला. त्यामुळे वेळोवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून आली आणि त्याचे रूपांतर गाळात झाले. पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाथसागरात सद्य:स्थितीत मृतसाठ्यात ३२ टक्के गाळ असल्याचे सांगितले. नाथसागरातील गाळ वेळोवेळी काढला गेला नाही. त्यामुळे वेळोवेळी नाथसागरातून पाणी गोदावरी पात्रात सोडावे लागले. असे असले तरी गाळाची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्यांचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मृत साठ्यातून पिण्यासाठी पाणी वापरले जात असून, आजचे बाष्पीभवन 0.८५७ दलघमी आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होतो आहे. या प्रकल्पातून सध्या सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. औद्योगिक वापर व पिण्यासाठी पाणी तेवढे दिले जाते. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ४० वर्षांपूर्वीच्या जलधारण क्षमतेवर आधारलेली असल्याने ती फसवी आहे. त्यामुळे अचानक हे पाणी कमी होऊन गाळ उघडा पडल्यास नवल नाही. आजच्या स्थितीत नाथसागरात किती गाळ आहे, किती काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास जलसंपदा विभागाने करून गाळ काढण्याची उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या भयानक दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून, या धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवणे हाच एकमेव पर्याय आता राहिला आहे. यात दिरंगाई होणार नाही याची विशेष दक्षता विभागीय आयुक्तांनी घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. गाळ काढला नाही तर मराठवाड्यावर मोठे जल संकट कोसळेल आणि वेळेवर काही केले नाही म्हणून बोंबा मारल्याशिवाय हाती काही लागणार नाही, अशी अवस्था भविष्यात पाहायला मिळेल.