शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जायकवाडी प्रकल्पात ३२% गाळ

By admin | Updated: May 24, 2016 01:21 IST

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला.

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला. त्यामुळे वेळोवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून आली आणि त्याचे रूपांतर गाळात झाले. पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाथसागरात सद्य:स्थितीत मृतसाठ्यात ३२ टक्के गाळ असल्याचे सांगितले. नाथसागरातील गाळ वेळोवेळी काढला गेला नाही. त्यामुळे वेळोवेळी नाथसागरातून पाणी गोदावरी पात्रात सोडावे लागले. असे असले तरी गाळाची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्यांचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मृत साठ्यातून पिण्यासाठी पाणी वापरले जात असून, आजचे बाष्पीभवन 0.८५७ दलघमी आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होतो आहे. या प्रकल्पातून सध्या सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. औद्योगिक वापर व पिण्यासाठी पाणी तेवढे दिले जाते. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ४० वर्षांपूर्वीच्या जलधारण क्षमतेवर आधारलेली असल्याने ती फसवी आहे. त्यामुळे अचानक हे पाणी कमी होऊन गाळ उघडा पडल्यास नवल नाही. आजच्या स्थितीत नाथसागरात किती गाळ आहे, किती काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास जलसंपदा विभागाने करून गाळ काढण्याची उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या भयानक दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून, या धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवणे हाच एकमेव पर्याय आता राहिला आहे. यात दिरंगाई होणार नाही याची विशेष दक्षता विभागीय आयुक्तांनी घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. गाळ काढला नाही तर मराठवाड्यावर मोठे जल संकट कोसळेल आणि वेळेवर काही केले नाही म्हणून बोंबा मारल्याशिवाय हाती काही लागणार नाही, अशी अवस्था भविष्यात पाहायला मिळेल.