शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी प्रकल्पात ३२% गाळ

By admin | Updated: May 24, 2016 01:21 IST

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला.

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला. त्यामुळे वेळोवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून आली आणि त्याचे रूपांतर गाळात झाले. पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाथसागरात सद्य:स्थितीत मृतसाठ्यात ३२ टक्के गाळ असल्याचे सांगितले. नाथसागरातील गाळ वेळोवेळी काढला गेला नाही. त्यामुळे वेळोवेळी नाथसागरातून पाणी गोदावरी पात्रात सोडावे लागले. असे असले तरी गाळाची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्यांचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मृत साठ्यातून पिण्यासाठी पाणी वापरले जात असून, आजचे बाष्पीभवन 0.८५७ दलघमी आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होतो आहे. या प्रकल्पातून सध्या सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. औद्योगिक वापर व पिण्यासाठी पाणी तेवढे दिले जाते. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ४० वर्षांपूर्वीच्या जलधारण क्षमतेवर आधारलेली असल्याने ती फसवी आहे. त्यामुळे अचानक हे पाणी कमी होऊन गाळ उघडा पडल्यास नवल नाही. आजच्या स्थितीत नाथसागरात किती गाळ आहे, किती काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास जलसंपदा विभागाने करून गाळ काढण्याची उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या भयानक दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून, या धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवणे हाच एकमेव पर्याय आता राहिला आहे. यात दिरंगाई होणार नाही याची विशेष दक्षता विभागीय आयुक्तांनी घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. गाळ काढला नाही तर मराठवाड्यावर मोठे जल संकट कोसळेल आणि वेळेवर काही केले नाही म्हणून बोंबा मारल्याशिवाय हाती काही लागणार नाही, अशी अवस्था भविष्यात पाहायला मिळेल.