शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

जायकवाडी प्रकल्पात ३२% गाळ

By admin | Updated: May 24, 2016 01:21 IST

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला.

जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला. त्यामुळे वेळोवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून आली आणि त्याचे रूपांतर गाळात झाले. पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाथसागरात सद्य:स्थितीत मृतसाठ्यात ३२ टक्के गाळ असल्याचे सांगितले. नाथसागरातील गाळ वेळोवेळी काढला गेला नाही. त्यामुळे वेळोवेळी नाथसागरातून पाणी गोदावरी पात्रात सोडावे लागले. असे असले तरी गाळाची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्यांचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मृत साठ्यातून पिण्यासाठी पाणी वापरले जात असून, आजचे बाष्पीभवन 0.८५७ दलघमी आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होतो आहे. या प्रकल्पातून सध्या सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. औद्योगिक वापर व पिण्यासाठी पाणी तेवढे दिले जाते. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ४० वर्षांपूर्वीच्या जलधारण क्षमतेवर आधारलेली असल्याने ती फसवी आहे. त्यामुळे अचानक हे पाणी कमी होऊन गाळ उघडा पडल्यास नवल नाही. आजच्या स्थितीत नाथसागरात किती गाळ आहे, किती काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास जलसंपदा विभागाने करून गाळ काढण्याची उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या भयानक दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून, या धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवणे हाच एकमेव पर्याय आता राहिला आहे. यात दिरंगाई होणार नाही याची विशेष दक्षता विभागीय आयुक्तांनी घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. गाळ काढला नाही तर मराठवाड्यावर मोठे जल संकट कोसळेल आणि वेळेवर काही केले नाही म्हणून बोंबा मारल्याशिवाय हाती काही लागणार नाही, अशी अवस्था भविष्यात पाहायला मिळेल.