शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

३०० ट्रक गाळ उपसला

By admin | Updated: May 5, 2016 00:13 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला असून,

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला असून, दोन दिवसांत तीनशे ट्रक गाळ उपसा झाला असल्याची माहिती मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी बुधवारी सांगितले.बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणा-या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी आता मानवलोक या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.या मोहिमेचा आज दिनांक ३ मे रोजी शुभारंभ करण्यात आला.मानवलोकच्या वतीने मांजरा धरणातील गाळ काढण्याचा आज दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डॉ. द्वारकादास लोहिया, राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते व अशोकराव देशमुख, अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, अनिकेत लोहिया, विठ्ठलराव जाधव, जयसिंग चव्हाण, वैजेनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. याकामी मानवलोकला महाराष्ट्र शासनासोबतच केअरींग फ्रेंड्स आणि गिव्ह इंडिया या संस्थांचे मिळत आहे सहकार्य. येथून काढण्यात येणारा गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत देण्यात येणार आहे. तसेच, याकामाची सुरूवात अंबाजोगाईच्या पंप हाऊसच्या परिसरापासून करण्यात आल्याने याठिकाणी पाणी संचय होण्यास मोठी मदत होणार आहे, परिणामी भविष्यात अंबाजोगाईसाठीच्या पाणी पुरवठ्यावर चांगला परिणाम होण्याची शक्यता. (वार्ताहर)स्तुत्य उपक्रम : सेवाभावी संस्थांनी पुढे यावेमांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या उपक्रमाला सर्वस्तरातून सहकार्य मिळत आहे. अजून सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन गाळ काढण्याच्या कामाला हातभार लावावा, असे आवाहन मानवलोकचे अनिकेत लोहिया यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे. दोन पोकलेन व ४० वाहनांद्वारे गाळ निघत आहे.