शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

मनपाची ३00 दुकाने बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीची दुकाने ३० ते ४० वर्षांपूर्वी भाडे करारावर दिली आहेत. ४६८ दुकानांपैकी ३०० भाडेकरू मनपाला भाडे भरत नाहीत.

मुजीब देवणीकर। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या मालकीची दुकाने ३० ते ४० वर्षांपूर्वी भाडे करारावर दिली आहेत. ४६८ दुकानांपैकी ३०० भाडेकरू मनपाला भाडे भरत नाहीत. अनेकांचे करार संपले आहेत. काही भाडेकरूंनी चक्क दुकानेच विकून टाकली आहेत. या भाडेकरूंवर त्वरित कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे मनपात एकच खळबळ उडाली असून, जुने रेकॉर्ड शोधून तब्बल ३०० दुकानांना लवकरच सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.नगर परिषद आणि मनपाच्या कार्यकाळात शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले आहेत. या संकुलांमधील ९० टक्के दुकाने राजकीय मंडळींनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली आहेत. काहींनी ३० वर्षांच्या करारावर तर काहींनी दरवर्षी भाडेपट्टा ठरवून दुकाने घेतली. मागील २५ ते ३० वर्षांपासून भाडेकरू मनपाला एक रुपयाही देत नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला आहे. या वृत्ताची दखल घेऊन खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली होती. मागील आठवड्यात यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढत त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळवून मागील आठ दिवसांपासून जुने रेकॉर्ड शोधणे सुरू केले आहे. हे रेकॉर्ड पाहून अधिकारी व कर्मचारीही अवाक् झाले आहेत. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या यादीनुसार ३०० जणांचे भाडेकरार केव्हाच संपले आहेत. अनेकांनी दुकाने दुसऱ्यांच्या नावावर करून टाकली आहेत. काही भाडेकरूंनी बाँडपेपरच्या आधारे दुकानांची विक्रीच करून टाकली आहे. महापालिकेने भाडेकरूंसोबत करार करताना जे भाडे ठरवून दिले होते ते भाडेसुद्धा आजपर्यंत भरण्यात आलेले नाही. दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा या निमित्ताने सहन करावा लागत आहे.