शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची ३00 दुकाने बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:02 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीची दुकाने ३० ते ४० वर्षांपूर्वी भाडे करारावर दिली आहेत. ४६८ दुकानांपैकी ३०० भाडेकरू मनपाला भाडे भरत नाहीत.

मुजीब देवणीकर। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या मालकीची दुकाने ३० ते ४० वर्षांपूर्वी भाडे करारावर दिली आहेत. ४६८ दुकानांपैकी ३०० भाडेकरू मनपाला भाडे भरत नाहीत. अनेकांचे करार संपले आहेत. काही भाडेकरूंनी चक्क दुकानेच विकून टाकली आहेत. या भाडेकरूंवर त्वरित कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे मनपात एकच खळबळ उडाली असून, जुने रेकॉर्ड शोधून तब्बल ३०० दुकानांना लवकरच सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.नगर परिषद आणि मनपाच्या कार्यकाळात शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले आहेत. या संकुलांमधील ९० टक्के दुकाने राजकीय मंडळींनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली आहेत. काहींनी ३० वर्षांच्या करारावर तर काहींनी दरवर्षी भाडेपट्टा ठरवून दुकाने घेतली. मागील २५ ते ३० वर्षांपासून भाडेकरू मनपाला एक रुपयाही देत नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला आहे. या वृत्ताची दखल घेऊन खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली होती. मागील आठवड्यात यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढत त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळवून मागील आठ दिवसांपासून जुने रेकॉर्ड शोधणे सुरू केले आहे. हे रेकॉर्ड पाहून अधिकारी व कर्मचारीही अवाक् झाले आहेत. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या यादीनुसार ३०० जणांचे भाडेकरार केव्हाच संपले आहेत. अनेकांनी दुकाने दुसऱ्यांच्या नावावर करून टाकली आहेत. काही भाडेकरूंनी बाँडपेपरच्या आधारे दुकानांची विक्रीच करून टाकली आहे. महापालिकेने भाडेकरूंसोबत करार करताना जे भाडे ठरवून दिले होते ते भाडेसुद्धा आजपर्यंत भरण्यात आलेले नाही. दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा या निमित्ताने सहन करावा लागत आहे.