शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित !

By admin | Updated: July 14, 2017 00:28 IST

बीड : २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे. कोषागार कार्यालयाने समाजकल्याणच्या कामात नियमांच्या आडून ढवळाढवळ सुरू केली आहे, त्याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे. समाजकल्याण विभाग याबाबत गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे.भारत सरकारच्या वतीने मुलांना शिक्षणात आधार व्हावा व ती मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत, यासारखे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून त्यांचे अर्ज भरून घेतले जातात. अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती वाटप केली जाते. गतवर्षी जिल्ह्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याणकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी केवळ २० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप झाली आहे. उर्वरित विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यातील ४२१ महाविद्यालये शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. गत दोन वर्षांपासून आॅनलाईन कारभार झाल्यामुळेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेतले जातात. हे अर्ज महाविद्यालयाकडून सामाजिक न्याय विभागात पाठविले जातात. तेथे त्याची छाननी व पडताळणी होऊन बिलाच्या मंजुरीसाठी कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात येतात. परंतु नूतन कोषागार अधिकारी यांनी वेगवेगळ्या नियमांची अट घालून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली आहे. समाजकल्याणकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला असल्याचे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व त्रुटी काढण्याचे अधिकार हे समाजकल्याण विभागाला आहेत. परंतु कोषागार कार्यालयाने यामध्ये ढवळाढवळ सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.