शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: March 30, 2017 23:43 IST

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असतानाच शासनाने पीकविम्याच्या रकमेतून ५० टक्के थकित कर्ज कपात करण्याचे आदेश दिले होते.

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असतानाच शासनाने पीकविम्याच्या रकमेतून ५० टक्के थकित कर्ज कपात करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश जिल्हा बँकेपर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा शासनाने आपला आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३० हजार १९४ शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठीच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम विमा कंपनीकडून अदा करण्यात आली असून, सध्या ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत २ लाख ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना १०२ कोटी ९३ लाख ८६ हजार ५९२ रुपये उपलब्ध झाले आहेत. बँकेने संबंधित शाखांकडे ही रक्कम वर्ग केली असून, अवघ्या एक-दोन दिवसांत वाटपास सुरुवात होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने जिल्हा बँकांचे थकित कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून ५० टक्के रक्कम कपात करण्याचे आदेश जिल्हा बँकांना गुरुवारी दिले होते. या आदेशाची माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे जिल्हा बँकांचे व्यवस्थापक शासनाच्या आदेशाची माहिती मिळविण्यासाठी वारंवार शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर व आपल्या ई-मेलवर पाहणी करीत होते. शासनाचा हा आदेश जिल्हा बँकेपर्यंत पोहोचण्याअगोदरच सरकारने आपले आदेश मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३० हजार १९४ शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड केली नव्हती. हे कर्ज ६६ कोटी २७ लाख रुपये आहे. गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावरून पीकविम्यातून थकीत कर्ज वसूल करणार असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. संतापही व्यक्त केला जात होता. मात्र शासनाने सदर आदेश मागे घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)