शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

३० हजार शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: March 30, 2017 23:43 IST

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असतानाच शासनाने पीकविम्याच्या रकमेतून ५० टक्के थकित कर्ज कपात करण्याचे आदेश दिले होते.

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यात गोंधळ सुरू असतानाच शासनाने पीकविम्याच्या रकमेतून ५० टक्के थकित कर्ज कपात करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश जिल्हा बँकेपर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा शासनाने आपला आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३० हजार १९४ शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठीच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम विमा कंपनीकडून अदा करण्यात आली असून, सध्या ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत २ लाख ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना १०२ कोटी ९३ लाख ८६ हजार ५९२ रुपये उपलब्ध झाले आहेत. बँकेने संबंधित शाखांकडे ही रक्कम वर्ग केली असून, अवघ्या एक-दोन दिवसांत वाटपास सुरुवात होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने जिल्हा बँकांचे थकित कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून ५० टक्के रक्कम कपात करण्याचे आदेश जिल्हा बँकांना गुरुवारी दिले होते. या आदेशाची माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे जिल्हा बँकांचे व्यवस्थापक शासनाच्या आदेशाची माहिती मिळविण्यासाठी वारंवार शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर व आपल्या ई-मेलवर पाहणी करीत होते. शासनाचा हा आदेश जिल्हा बँकेपर्यंत पोहोचण्याअगोदरच सरकारने आपले आदेश मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३० हजार १९४ शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड केली नव्हती. हे कर्ज ६६ कोटी २७ लाख रुपये आहे. गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावरून पीकविम्यातून थकीत कर्ज वसूल करणार असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. संतापही व्यक्त केला जात होता. मात्र शासनाने सदर आदेश मागे घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)