शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

३० हजार शेतकरी पीकविम्यास अपात्र

By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST

लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़

लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्यासाठी जिल्ह्यातील ३० हजार ५६ शेतकरी अपात्र ठरले आहेत़ त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे़सन २०१५-१६ च्या रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफुल, गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग, भात अशा आठ पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात आली होती़ गत वर्षीच्या दुष्काळामुळे रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना रबी हंगामही घेता आला नाही़ त्यातच ज्या शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला होता, त्या शेतकऱ्यांच्या पदरी पेरणीचा खर्चही पडला नाही़दुष्काळामुळे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६४५ शेतकऱ्यांनी रबी हंगामाच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता़ याअंतर्गत १ लाख ७९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा भरला होता़ या कृषी विम्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यापोटी जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्याचा २ लाख ६७ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, संबंधित विमा कंपनीकडून लाभार्थ्यांच्या याद्या बँकेकडे पाठविण्यात आल्या नाहीत़