शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

३० हजार शेतकरी पीकविम्यास अपात्र

By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST

लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़

लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्यासाठी जिल्ह्यातील ३० हजार ५६ शेतकरी अपात्र ठरले आहेत़ त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे़सन २०१५-१६ च्या रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफुल, गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग, भात अशा आठ पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात आली होती़ गत वर्षीच्या दुष्काळामुळे रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना रबी हंगामही घेता आला नाही़ त्यातच ज्या शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला होता, त्या शेतकऱ्यांच्या पदरी पेरणीचा खर्चही पडला नाही़दुष्काळामुळे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६४५ शेतकऱ्यांनी रबी हंगामाच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता़ याअंतर्गत १ लाख ७९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा भरला होता़ या कृषी विम्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यापोटी जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्याचा २ लाख ६७ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, संबंधित विमा कंपनीकडून लाभार्थ्यांच्या याद्या बँकेकडे पाठविण्यात आल्या नाहीत़