शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पोळ्यासाठी ३० लाखांवर नारळांची आवक

By admin | Updated: September 1, 2016 01:03 IST

राजेश खराडे , बीड वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा! बुधवारी खांदेमळणी असून गुरुवारी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे

राजेश खराडे , बीडवर्षभर शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा! बुधवारी खांदेमळणी असून गुरुवारी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे. बीडमध्ये महिनाभराच्या विश्रांतीनंतर पोळ्याच्या दोन दिवस आधी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांत पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठही फुलली असून बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साजश्रृंगार खरेदीची लगबग सुरु आहे. खास सणानिमित्त ३० लाख नारळाची आवक झाली आहे.सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा पीक चांगले आले. मात्र, महिन्यापासून वरुणराजा रुसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नैराश्येचे वातावरण निर्माण होऊ लागले होते. दोन दिवसांपूर्वीच पावसाने जोरदार ‘कमबॅक’ केले. त्यामुळे निराशा झटकून शेतकरी पोळा धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी उत्साहाने बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. बीडमधील मोंढ्यात बुधवारी खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी लाडक्या सर्जा- राजासाठी कासरा, सर, मोरखी, वेसन, झूल, बाशिंग खरेदी करत होते. पोळ्यादिवशी बैलांना नवरदेवाप्रमाणे सजवून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पुरणपोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. यंदा बैलांच्या पायात घालण्यासाठी घुंगराचा चाळ व शिंगावर लावण्याकरता तुरा सर हा नवीन साज बाजारात आला आहे. साजसाहित्याच्या किंमती स्थिर असून पाऊस झाल्यामुळे शेतकरी जोमाने खरेदी करत असल्याचे विक्रेते विवेक चरखा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तपोळ्यादिवशी मिरवणुकीदरम्यान वाद, विवाद होतात. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. राज्य राखीव दलाची एक तुकडी मागविली असून स्थानिक पोलीस बंदोबस्तावर असतील. त्यांच्या दिमतीला ३०० पुरुष व १०० महिला होमगार्ड कर्तव्यावर राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. संवेदनशील गावांत पोलिसांची जादा कुमक तैनात राहणार आहे. पोळा सण शांततेत साजरा होईल, यादृष्टीने सर्वतोपरी उपाय केल्याचे नरवाडे म्हणाले.पोळ्यादिवशी काळ्याआईसह शिवारातील साऱ्या देवदेवतांची पूजाअर्चा केली जाते. त्यासाठी नारळ खरेदी मोठ्या प्रमाणावर असते. तामिळनाडू, आंध्रप्रदेशातून यंदा ३० लाखांवर नारळांची आवक झाली असून किंमतीत निम्म्याने घट आहे. गतवर्षी १२०० ते १४०० रुपयांपर्यंत गेलेले दर यंदा ५०० ते ७०० रुपये शेकडा इथपर्यंत गडगडले आहेत. बीडमधून औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही नारळाची होलसेल विक्री होते, असे व्यापारी केदारनाथ झंवर यांनी सांगितले.