शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

डिफर्ड पेमेंटच्या कामात पालिकेला ३० कोटींचा गंडा!

By admin | Updated: May 22, 2014 00:57 IST

औरंगाबाद : महापालिकेत डिफर्ड पेमेंटचा (टप्प्याटप्प्याने बिल अदा करणे) सावकारी धंदा सुरू आहे. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा बसत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

औरंगाबाद : महापालिकेत डिफर्ड पेमेंटचा (टप्प्याटप्प्याने बिल अदा करणे) सावकारी धंदा सुरू आहे. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा बसत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. ११० कोटी रुपयांची कामे डिफर्ड पेमेंटने केली असून, ती कामे ८० कोटींत झाली असती. ३० कोटी रुपये जास्तीची रक्कम देऊनही अनेक रस्ते झालेले नाहीत. मात्र, पालिकेने बिल दिल्याचा संशय नगरसेवकांना आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यांच्या कामात डिफर्ड पेमेंट हा प्रकार तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या काळापासून सुरू झाला असून, सध्या पालिकेत डिफर्ड पेमेंटच्या नावाखाली सावकारी धंदा सुरू आहे. कंत्राटदारांच्या मध्यस्थीने मनपातील महायुतीच्या साखळीचे कल्याण करणारी ही व्याजबट्ट्याची सावकारी शहराला खड्ड्यात घालत आहे. नगरसेवकांचा आरोप... शहरात डिफर्ड पेमेंटवर करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे मनपाचे मोठे नुकसान झाले आहे. एमजीएम सेंट्रल नाका ते टी.व्ही.सेंटर हा रस्ता पूर्ण झालेला नाही. मग त्या रस्त्याची रक्कम कुणाच्या घरात चालली आहे. असा सवाल राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी केला. याची चौकशी झाली पाहिजे. ३ वर्षांची मुदत असताना १ वर्षातच बिल अदा केले गेले. चिश्तिया चौक ते बळीराम पाटील चौक हा रस्ता झालाच नाही. त्याचे बिल अदा केल्याचा आरोपही त्यांनी केला. शहर अभियंता म्हणाले... बळीराम पाटील ते चिश्तिया चौक हे डिफर्ड पेमेंटवर हाती घेण्याचे ठरले होते. मात्र, मनपाकडे पैसे नसल्यामुळे हा रस्ता केला नाही. नजीकच्या काळात त्या रस्त्याचे काम करू. २००९ मध्ये रस्त्याची निविदा निघाली होती. असे शहर अभियंता एस.डी.पानझडे यांनी सांगितले. वर्ष २०१०-११ साली ५६ कोटी ८९ लाख रुपयांचे कंत्राट मनपाने जी. एन. आय. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले. ३९.९५ टक्के जास्त दराने ती कामे दिल्याने ७९ कोटी ६१ लाख रुपयांमध्ये ती कामे गेली. २५ कोटी रुपये जास्तीची रक्कम मनपाने डिफर्डच्या करारानुसार कंत्राटदाराला दिली. १३ व्या वित्त आयोगातून १६ कोटी ४२ लाख रुपयांतून क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता करण्याचे ठरले. १८ कोटींत त्या रस्त्यांचे कंत्राट डिफर्डमुळे गेले. २ कोटी तेथे जास्त जाणार आहेत. शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या ४६ कोटींच्या कामांच्या निविदा ४९ कोटींत गेल्या.३ कोटी रुपये डिफ र्डमुळे जास्तीचे द्यावे लागणार आहेत. जी.एन.आय.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एमआयडीसी चिकलठाण्यातील कामांचे कंत्राट देण्यात आले. २० कोटींची कामे २७ कोटींत दिली गेली. २००६-१० या काळात ११० कोटींची कामे डिफर्ड पेमेंटवर आहेत. ८० कोटींपर्यंत त्या कामाचे अंदाजपत्रक होते. ४० टक्के काम सुरू करताना व ३०-३० टक्के काम झाल्यावर तीन वर्षांत रस्त्याचे बिल अदा करण्याच्या पद्धतीला डिफर्ड पेमेंट असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे उधारीत कामे करून देण्यासाठी व्याजासह पैसा वसूल करण्याचा हा प्रकार आहे. कंत्राटदार १० कोटींची कामे १४ कोटींना वाटाघाटीअंती घेतो. ४ कोटी रुपये कंत्राटदाराला जास्त देण्यात येतात. कारण कंत्राटदार तीन वर्षांत स्वखर्चातून रस्ता तयार करणार असतो. आता मनपाची आर्थिक स्थिती वाईट आहे. मात्र, आतापर्यंत डिफर्ड पेमेंटच्या ११९ कोटींच्या रस्त्यांसाठी १४६ कोटी कंत्राटदारांना द्यावे लागतील. त्यातील ३० टक्के रक्कम मनपाने अदा केल्याचे सूत्रांनी सांगितले.