शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ 3 पोलिसांना अटकपूर्व जामीन

By admin | Updated: July 24, 2014 00:39 IST

औरंगाबाद : कुख्यात दरोडेखोर ज्ञानेश्वर पिंपळे यास पळून जाण्यास मदत केल्याच्या प्रकरणात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व आरोपी असलेल्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

औरंगाबाद : कुख्यात दरोडेखोर ज्ञानेश्वर पिंपळे यास पळून जाण्यास मदत केल्याच्या प्रकरणात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व आरोपी असलेल्या तीन पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.पोलीस कॉन्स्टेबल विश्वास प्रभाकर निकम, सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ चंपतराव गंगावणे आणि हेडकॉन्स्टेबल सुनील किशनराव प्रधान, अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्या पोलिसांची नावे आहेत. हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ज्ञानेश्वर पिंपळे याच्या विरोधात राहाता (जि.अहमदनगर) येथील न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्यात २४ डिसेंबर २०१३ रोजी त्यास हजर करून परत हर्सूल कारागृहात आणून सोडण्याची जबाबदारी या पोलिसांवर होती. त्याप्रमाणे त्यास न्यायालयात हजर करून ते मध्यवर्ती बसस्थानक येथून आरोपीला घेऊन कारागृह परिसरात गेले. त्यावेळी पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो कारागृह अधीक्षकांच्या घरापासून पळून गेला होता. या प्रकरणी सहायक फौजदार गंगावणे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा ठाण्यात पिंपळेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, पोलीस विभागाने या पलायन प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली. या चौकशीत तिन्ही पोलीस कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला कोर्टात ने-आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करणे, मनमानीपणे चौधरी कॉलनी येथे राहणाऱ्या आरोपीच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यास घेऊन जाणे आणि त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आरोपी पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांना तेथे अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला. त्या विरोधात त्यांनी अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अपील याचिका दाखल केली. या याचिकेत न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सदर याचिक आज पुन्हा न्यायालयासमोर आली असता न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कायम केला. याप्रसंगी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता भारती गुंजाळ यांनी, तर याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी, अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी सहकार्य केले.