शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शेकट्याजवळ दोन अपघातांत ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क करमाड : औरंगाबाद-जालना मार्गावर गोलटगाव फाट्याजवळील हॉटेल अजिंक्यजवळ ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने दोन जण जागीच ...

लोकमत न्यूज नेटवर्ककरमाड : औरंगाबाद-जालना मार्गावर गोलटगाव फाट्याजवळील हॉटेल अजिंक्यजवळ ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर १२ जण जखमी झाले. या अपघातात चालक पुरुषोत्तम किसन वायाळ (४०) व प्रकाश शंकर भुतेकर (३५, रा. दोघेही खोळेगाव, ता. लोणार (जिल्हा बुलढाणा) हे दोघे गाडीखाली दबून जागीच ठार झाले. शेकटा शिवारात झालेल्या अन्य एका अपघातात रस्त्यावर उभ्या ट्रॅव्हल्स बसवर ट्रक आदळल्याने एक जण जागीच ठार झाला.सध्या महाराष्ट्रात एसटी कर्मचा-यांचा संप चालू असल्याने प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. चाकण पुणे येथून जवळपास १५ कामगार दिवाळीसाठी ( एम एच २० बी. टी.१११३) या ट्रकमधून खोळेगाव (ता. लोणार जि. बुलढाणा) येथे जात असताना औरंगाबाद-जालना मार्गावरील गोलटगाव फाट्याजवळ एका मोटारसायकलस्वारास वाचवताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर इतर बारा प्रवासी जखमी झाले. भगवान दिगंबर वायाळ (३५), अरुण बद्रीनाथ सानप (४३) रा. खोळेगाव ता. लोणार जि. बुलढाणा यांच्यासह इतर १० जखमींची नावे कळाली नाही. अपघात होताच स्थानिकांनी करमाड पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना औरंगाबाद येथील घाटीत दाखल करून क्रेनच्या साह्याने आयशर ट्रक रस्त्याच्या बाजूला केला.अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे, जमादार रवींद्र साळवे, नामदेव धोंडकर करीत आहे.