शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जलयुक्त लातूरसाठी जमले ३ कोटी ५० लाख

By admin | Updated: April 16, 2016 23:43 IST

लातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,

आर्ट आॅफ लिव्हिंगचा पुढाकार : विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, उद्योजकांचा हातभारलातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,व्यापारी महासंघ व अनेक दानशुर व्यक्ती सरसावल्या आहेत़ मदतीचा ओघ दिवसागणिक वाढत आहे सर्वसामान्य नागरिकापासून चहावाल्यासह विद्यार्थीही मदतीसाठी सरसावले असून, या कामासाठी विविध सामाजिक संस्थांकडून ३ कोटी ५० लाखांचा निधी संकलित झाला आहे़ ३१ मे पर्यंत सदरील १८ किमी चे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्या दृष्टीने या कामाला गती देण्यात आली आहे़साई-नागझरी, कारसा, पोहरेगाव याठिकाणी नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम ८ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले आहे़ हे काम पूर्णपणे शासनाच्या मदतीशिवाय आर्ट आॅफ लिव्हींग, जनकल्याण समिती, इंडीयन मेडिकल असोसिएशन, व्यापारी महासंघ, शैक्षणिक संस्था यांच्यासह हॉटेल चालक,विद्यार्थ्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे़ १८ किमी लांब, ८० मिटर रुंद, ३ मिटर खोल या प्रमाणात सुरु असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाला भरभरून मदत देण्याचे काम सुरु झाले आहे़ या कामासाठी ७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित असून, सर्व कामे लोकसहभागातूनच पूर्ण करण्याचे नियोजन सुरु असल्याने या कामासाठी आर्ट आॅफ लिव्हींग तर्फे १ कोटी, इंडियन मेडीकल असोसिएशन तर्फे ५१ लाख, जलकल्याण समितीतर्फे ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यासह दयानंद शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर विद्यालय, छत्रपती शिक्षण संस्था, महाराष्ट्र बायो फर्टीलायझर्स, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सक्रीयपणे सहभाग दर्शविला आहे़ ८ ते ९ एप्रिल रोजी सुरु करण्यात आलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे मे अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याने ५० जेसीबी वाढवून या कामाला गती दिली जाणार आहे़ जलयुक्त लातूर अन् सर्वांसाठी पाणी ही लोकचळवळ गतीमान करण्यासाठी डॉ़अशोक कुकडे, अ‍ॅड़त्र्यंबकदास झंवर, मनोहर गोमारे, बी़बी़ठोंबरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असून, या कामला गती देण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हींगचे मकरंद जाधव व महादेव गोमारे हे परिश्रम घेत आहेत़ या कामासाठी आतापर्यंत ६० लाखांचा खर्च झाला आहे़ कुठल्याही शासकीय मदतीविना लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यात येत असल्याने ही चळवळ गतीमान होणार असल्याचे मकरंद जाधव म्हणाले़