शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जलयुक्त लातूरसाठी जमले ३ कोटी ५० लाख

By admin | Updated: April 16, 2016 23:43 IST

लातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,

आर्ट आॅफ लिव्हिंगचा पुढाकार : विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, उद्योजकांचा हातभारलातूर: लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,व्यापारी महासंघ व अनेक दानशुर व्यक्ती सरसावल्या आहेत़ मदतीचा ओघ दिवसागणिक वाढत आहे सर्वसामान्य नागरिकापासून चहावाल्यासह विद्यार्थीही मदतीसाठी सरसावले असून, या कामासाठी विविध सामाजिक संस्थांकडून ३ कोटी ५० लाखांचा निधी संकलित झाला आहे़ ३१ मे पर्यंत सदरील १८ किमी चे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्या दृष्टीने या कामाला गती देण्यात आली आहे़साई-नागझरी, कारसा, पोहरेगाव याठिकाणी नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम ८ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले आहे़ हे काम पूर्णपणे शासनाच्या मदतीशिवाय आर्ट आॅफ लिव्हींग, जनकल्याण समिती, इंडीयन मेडिकल असोसिएशन, व्यापारी महासंघ, शैक्षणिक संस्था यांच्यासह हॉटेल चालक,विद्यार्थ्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे़ १८ किमी लांब, ८० मिटर रुंद, ३ मिटर खोल या प्रमाणात सुरु असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाला भरभरून मदत देण्याचे काम सुरु झाले आहे़ या कामासाठी ७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित असून, सर्व कामे लोकसहभागातूनच पूर्ण करण्याचे नियोजन सुरु असल्याने या कामासाठी आर्ट आॅफ लिव्हींग तर्फे १ कोटी, इंडियन मेडीकल असोसिएशन तर्फे ५१ लाख, जलकल्याण समितीतर्फे ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यासह दयानंद शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर विद्यालय, छत्रपती शिक्षण संस्था, महाराष्ट्र बायो फर्टीलायझर्स, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सक्रीयपणे सहभाग दर्शविला आहे़ ८ ते ९ एप्रिल रोजी सुरु करण्यात आलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे मे अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याने ५० जेसीबी वाढवून या कामाला गती दिली जाणार आहे़ जलयुक्त लातूर अन् सर्वांसाठी पाणी ही लोकचळवळ गतीमान करण्यासाठी डॉ़अशोक कुकडे, अ‍ॅड़त्र्यंबकदास झंवर, मनोहर गोमारे, बी़बी़ठोंबरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असून, या कामला गती देण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हींगचे मकरंद जाधव व महादेव गोमारे हे परिश्रम घेत आहेत़ या कामासाठी आतापर्यंत ६० लाखांचा खर्च झाला आहे़ कुठल्याही शासकीय मदतीविना लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यात येत असल्याने ही चळवळ गतीमान होणार असल्याचे मकरंद जाधव म्हणाले़