शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

२९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST

अशोक अनगुलवार , हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते.

अशोक अनगुलवार , हिमायतनगरतालुक्यातील दरेसरसम साठवण तलावात ९७ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ११ हेक्टर जमीन पुन्हा संपादन करण्यात आली. दरेसरसम तलाव कोंडला तर २९४ हेक्टर पाण्याखाली येऊ शकते.२००७ मध्ये शेतकऱ्यांच्या १०७ हे. जमीनीचा मावेजा ८० टक्के २०११ मध्ये मिळाला. नवीन रेटप्रमाणे शेतकऱ्यांना दीड कोटीचा डिफरन्स मिळणार असल्याचे अधीक्षक अभियंता कुरुडे यांनी सांगितले. दरेसरसम साठवण तलावात दरेसरसम, आंदेगाव, पवना येथील जमिनी गेल्या आहेत. या साठवण तलावावर लिफ्ट इरिगेशन केल्यास २९४ हे. जमीन पाण्याखाली येणार आहे. परंतु शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा न मिळाल्याने गेल्या ५ वर्षापासून हा साठवण तलाव कोंडण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. पोट भरण्याचा जमिनीचा तुकडाच दरेसरसम साठवण तलावात गेल्याने व २००७ च्या रेटप्रमाणे मिळणारा मावेजा २०११ मध्ये देत असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यावर हिमायतनगर तालुक्यात सुना, पवना, पोट, दुधड पिचोंडी हे तलाव असून सुना, पवना, दुधड, पोटा तलावामुळे त्या त्या भागात सिंचनाची व्यवस्था झाली. खरीप, रब्बी, बारमाही पीक शेतकरी घेत आहे. तालुक्यात पैनगंगा नदी असल्याने नदीकाठच्या १५ ते २० गावाला त्याचा लाभ मिळत आहे. पैनगंगा नदीवर गाजेगाव व वारणटाकळी येथे बंधारा आहे. त्यामुळे बरेच शेतकरी ऊसाचे पीक घेत आहेत.तालुक्यात २९ हजार ५० विहिरी आहेत. शेतजमीनही नदीकाठची चांगली आहे. बाकी चरडभरड, मध्यम आहे. दरेसरसम साठवण तलाव कोंडला तर शेतकऱ्याची २९४ हेक्टर जमीन पाण्याखाली येवून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या साठवण तलावामुळे दरेसरसम, पवना, आंदेगाव, सरसम, खडकी, पार्डी, टेंभी आदी गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन रेटप्रमाणे मावेजा शासनाकडून मिळणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे शक्य दिसत नाही.अस्तित्वात असलेले पवना, सुना, पोटा, दुधड, पिंचोर्डी तलावात मोठा गाळ साचला आहे. हा साचलेला गाळ दरवर्षी काढणे आवश्यक आहे. गाळाचे महत्व अद्यापही शेतकऱ्यांना पटले नाही. शेतकरी रासायनिक खतालाच प्राधान्य देत आहे.पाचही साठवण तलावात गाळाबरोबर बेशरम, झुडपे, वनस्पती वाढल्याने तलाव उथळ होवून साठवण क्षमता कमी झाली आहे. लोकसहभागातून हा गाळ काढणे आवश्यक आहे. ४ ते ५ कि.मी. पाणीपातळी वाढणारस्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार शासनस्तरावर मावेजा मिळावा व धरण तयार होवून ते कोंडण्यास शेतकऱ्यांनी परवानगी द्यावी यासाठी जि.प. सदस्य सुभाष राठोड, मार्केट कमेटीचे सभापती दत्तराम पा. करंजीकर आणि अधीक्षक अभियंता कुरुडे, कार्यकारी अभियंता तिवारी आणि धरणग्रस्त शेतकरी यांच्यात चर्चा होवून लवकर तोडगा निघावा ही अपेक्षा आहे. साठवण तलाव कोंडल्यास परिसरात ४ ते ५ किमी पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.