शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

विभागात २.८८ टक्के खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:04 IST

--- औरंगाबाद : लहरी पावसामुळे अद्याप अनेक ठिकाणी पेरण्या थांबल्या आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन ८ दिवस सरले. अद्याप ...

---

औरंगाबाद : लहरी पावसामुळे अद्याप अनेक ठिकाणी पेरण्या थांबल्या आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन ८ दिवस सरले. अद्याप विभागातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात केवळ २.८८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात जालना जिल्हा पेरणीत आघाडीवर असून, ६.११ टक्के, बीड ३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ०.१८ टक्के पेरणी झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली. जिल्ह्यात पेरणीची प्रत्यक्ष स्थिती आणि कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत आहे.

जिल्ह्यासह मराठवाड्यात रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र, मृग नक्षत्रात अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याने धूळ पेरणीतील उगवण झाली मात्र, कडकडत्या उन्हात उगवलेली पिके तग धरत नसल्याची सध्या परिस्थिती आहे, तर पेरणी योग्य ७० ते ८० मिलीमीटर पाऊस न झाल्याने अद्याप ९५ टक्क्यांहून अधिक पेरण्या खोळंबल्या आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात तालुका पातळीवरून पेरणीची आकडेवारी मिळण्यास उशीर होत असल्याने प्रत्यक्ष पेरणी आणि आकडेवारी यात फरक जाणवत आहे.

जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत सरासरी १९ लाख ९९ हजार ५३६ हेक्टर खरीपचे पेरणी क्षेत्र आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२४ हेक्टर (०.१८ टक्के), जालना जिल्ह्यात ३४ हजार ८९३ हेक्टर (६.११ टक्के), तर बीड जिल्ह्यात २१ हजार २७३ हेक्टर (३.०० टक्के) अशी एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५७ हजार ४९० हेक्टरवर २.८८ टक्के पेरणीपूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये खरिपाचे मका, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, भुईमूग, कापूस, बाजरी आदी पिकांसह कडधान्य पिकांचा समावेश आहे. जिल्हात कपाशीचे क्षेत्र कमी होताना दिसत असून, सोयाबीन, मक्याला अधिक पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.