शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

विभागात २.८८ टक्के खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:04 IST

--- औरंगाबाद : लहरी पावसामुळे अद्याप अनेक ठिकाणी पेरण्या थांबल्या आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन ८ दिवस सरले. अद्याप ...

---

औरंगाबाद : लहरी पावसामुळे अद्याप अनेक ठिकाणी पेरण्या थांबल्या आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन ८ दिवस सरले. अद्याप विभागातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात केवळ २.८८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात जालना जिल्हा पेरणीत आघाडीवर असून, ६.११ टक्के, बीड ३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ०.१८ टक्के पेरणी झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली. जिल्ह्यात पेरणीची प्रत्यक्ष स्थिती आणि कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत आहे.

जिल्ह्यासह मराठवाड्यात रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र, मृग नक्षत्रात अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याने धूळ पेरणीतील उगवण झाली मात्र, कडकडत्या उन्हात उगवलेली पिके तग धरत नसल्याची सध्या परिस्थिती आहे, तर पेरणी योग्य ७० ते ८० मिलीमीटर पाऊस न झाल्याने अद्याप ९५ टक्क्यांहून अधिक पेरण्या खोळंबल्या आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात तालुका पातळीवरून पेरणीची आकडेवारी मिळण्यास उशीर होत असल्याने प्रत्यक्ष पेरणी आणि आकडेवारी यात फरक जाणवत आहे.

जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत सरासरी १९ लाख ९९ हजार ५३६ हेक्टर खरीपचे पेरणी क्षेत्र आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२४ हेक्टर (०.१८ टक्के), जालना जिल्ह्यात ३४ हजार ८९३ हेक्टर (६.११ टक्के), तर बीड जिल्ह्यात २१ हजार २७३ हेक्टर (३.०० टक्के) अशी एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५७ हजार ४९० हेक्टरवर २.८८ टक्के पेरणीपूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये खरिपाचे मका, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, भुईमूग, कापूस, बाजरी आदी पिकांसह कडधान्य पिकांचा समावेश आहे. जिल्हात कपाशीचे क्षेत्र कमी होताना दिसत असून, सोयाबीन, मक्याला अधिक पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.