शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

जिल्ह्यात २.८५ लाख लोकांनी घेतली लस, पण दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ८.५९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरण सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत २ लाख ८५ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरण सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत २ लाख ८५ हजार लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, यात आतापर्यंत ८.५९ टक्के म्हणजे २४ हजार ५६० लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे ३ महिन्यांच्या लसीकरणात जेमतेम २४ हजार नागरिकांत प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकली. विशेष म्हणजे ज्यांना सर्वात आधी कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली होती. परंतु तीन महिन्यांत केवळ ४५.१७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनीच दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. पुढील टप्प्यात ६० वर्षांवरील, विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील आणि नंतर ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येऊ लागली. गेल्या ३ महिन्यांत जिल्ह्यात कोरोना लसीचे ३ लाख १० हजार १५७ डोस आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. यात पहिल्या डोसचे प्रमाण २ लाख ८५ हजार ५९७ इतके आहे. तर दुसऱ्या डोसचे प्रमाण २४ हजार ५६० आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर किमान १५ ते १६ दिवसांनंतर प्रतिकारशक्ती तयार होते, असे सांगितले जाते. त्यामुळे ही प्रतिकाशक्ती तयार होण्यापासून नागरिक अद्यापही दूर असल्याची स्थिती आहे.

----

लसीकरणाची स्थिती

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस- ३३,९४५

दुसरा डोस-१५,३३५

-----

फ्रंटलाइन वर्कर्स

पहिला डोस- ४२,७८३

दुसरा डोस- ५,६९०

--------

४५ वर्षांवरील नागरिक

पहिला डोस- १,०३,६७२

दुसरा डोस- १,४०८

----

६० वर्षांवरील नागरिक

पहिला डोस- १,०५,१९७

दुसरा डोस- २,१२७

---