शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

पद्मविभूषणपेक्षा २७ हजार शस्त्रक्रिया केल्याचा आनंद मोठा !

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

लातूर :शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

दत्ता थोरे। लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मी साध्या किराणा दुकानदाराचा मुलगा. अशोक कुकडे आणि विजय कर्णिक हे माझे वर्गमित्र म्हणून आयुष्यात आले आणि मी कुटुंबाच्या पार्श्वभूमीप्रमाणे व्यापारी व्हायचे सोडून डॉक्टर झालो. वयाची ८० वर्षे समाधानाने पूर्ण केली. मला मिळालेले पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी आनंद दिला. मी मेहनत करीत गेलो ते मिळत गेले. पण या तीन पुरस्कारांपेक्षा माझ्या हातून २७ हजार शस्त्रक्रिया झाल्या, याचा आनंद मला मोठा आहे. मुंबईच्या ९३ च्या दंगलीत मी सलग ७२ तास न झोपता शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.खासगी दौऱ्यानिमित्त लातूर येथे आले असता ते मंगळवारी खास ‘लोकमत’शी बोलत होते. आपल्या मुलाखतीत वैद्यकीय शिक्षण, उपचार आणि मेडिकल इथिक्सबाबतही त्यांनी मते मांडली. ते म्हणाले की, पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेने भारत उपचारासाठी स्वस्त आहे. पण आरोग्याच्या विम्याबाबत जागृती नाही, जी नेमकी परदेशात आहे. आपल्या देशातील नोकरदारांचा आरोग्य विमा कंपन्या सक्तीने करतात. मात्र मध्यमवर्गीयांना आरोग्य विम्यातून उपचार होण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न हवेत. वैद्यकीय शिक्षणात सरकारचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मी बांगला देशाला गेलो होतो. तिथेही मेडिकल अ‍ॅडमिशन सरकार करते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये धर्मादाय असल्यामुळे रुग्णालयाला उत्पन्न मिळत नाही. यासाठी सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा कोटा वाढवायला हवा. भारतात डॉक्टरांची संख्या कमी आहे. लोकसंख्येच्या आकारमानानुसार डॉक्टर कमी आहेत. यासाठी एका प्रोफेसरला तीन - तीन विद्यार्थी घ्यायची परवानगी द्यावी.