शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

पद्मविभूषणपेक्षा २७ हजार शस्त्रक्रिया केल्याचा आनंद मोठा !

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

लातूर :शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

दत्ता थोरे। लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मी साध्या किराणा दुकानदाराचा मुलगा. अशोक कुकडे आणि विजय कर्णिक हे माझे वर्गमित्र म्हणून आयुष्यात आले आणि मी कुटुंबाच्या पार्श्वभूमीप्रमाणे व्यापारी व्हायचे सोडून डॉक्टर झालो. वयाची ८० वर्षे समाधानाने पूर्ण केली. मला मिळालेले पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी आनंद दिला. मी मेहनत करीत गेलो ते मिळत गेले. पण या तीन पुरस्कारांपेक्षा माझ्या हातून २७ हजार शस्त्रक्रिया झाल्या, याचा आनंद मला मोठा आहे. मुंबईच्या ९३ च्या दंगलीत मी सलग ७२ तास न झोपता शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.खासगी दौऱ्यानिमित्त लातूर येथे आले असता ते मंगळवारी खास ‘लोकमत’शी बोलत होते. आपल्या मुलाखतीत वैद्यकीय शिक्षण, उपचार आणि मेडिकल इथिक्सबाबतही त्यांनी मते मांडली. ते म्हणाले की, पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेने भारत उपचारासाठी स्वस्त आहे. पण आरोग्याच्या विम्याबाबत जागृती नाही, जी नेमकी परदेशात आहे. आपल्या देशातील नोकरदारांचा आरोग्य विमा कंपन्या सक्तीने करतात. मात्र मध्यमवर्गीयांना आरोग्य विम्यातून उपचार होण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न हवेत. वैद्यकीय शिक्षणात सरकारचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मी बांगला देशाला गेलो होतो. तिथेही मेडिकल अ‍ॅडमिशन सरकार करते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये धर्मादाय असल्यामुळे रुग्णालयाला उत्पन्न मिळत नाही. यासाठी सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा कोटा वाढवायला हवा. भारतात डॉक्टरांची संख्या कमी आहे. लोकसंख्येच्या आकारमानानुसार डॉक्टर कमी आहेत. यासाठी एका प्रोफेसरला तीन - तीन विद्यार्थी घ्यायची परवानगी द्यावी.