शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

२७ टक्के विद्यार्थ्यांची एमपीएससीच्या परीक्षेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : ‘कसा गेला पेपर, सोप्पा होता ना?’ असे मित्र नातेवाइकांचे परीक्षा केंद्राबाहेर पडताच प्रश्न होते, तर परीक्षार्थींकडून ...

---

औरंगाबाद : ‘कसा गेला पेपर, सोप्पा होता ना?’ असे मित्र नातेवाइकांचे परीक्षा केंद्राबाहेर पडताच प्रश्न होते, तर परीक्षार्थींकडून ‘पेपर सोप्पा होता, थोडा अवघड गेला’ अशा स्वरूपाची उत्तरे ऐकायला मिळाली. कोरोनामुळे पाच वेळा पुढे ढकललेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०’ शनिवारी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान पार पडली. शहरातील ६० केंद्रांवर १४ हजार २०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर तब्बल २७ टक्के विद्यार्थी गैरहजर होते.

विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कक्ष सहाय्यक पदांसाठी झालेल्या परीक्षेला अर्ज भरलेल्या १९ हजार ६८० उमेदवारांची बैठक व्यवस्था होती. त्यापैकी १४ हजार २०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर पाच हजार ४५४ विद्यार्थी गैरहजर राहिले.

विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. सकाळी ९.३० ते १०.३० वाजता सॅनिटायझरचा फवारा हातावर मारून थर्मल गनने विद्यार्थ्यांची तपासणी केल्या गेली. तसेच विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोज या साहित्याचे पॅकेट वाटप केले. १०.३० वाजेनंतर प्रवेश नव्हता. स्पष्ट सूचना आणि नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अडचणी आल्या नाहीत. केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तही होता. परीक्षेसाठी एक हजार ९६८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले होते.

---

- ६० परीक्षा केंद्र

- १९,६६३ विद्यार्थ्यांचे अर्ज

- १४,२०९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

- ५,४५४ विद्यार्थी राहिले गैरहजर

- १,९६८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची निगराणी

---

परीक्षार्थी म्हणतात...

माझा एमपीएससीचा पहिलाच अटेम्ट होता. पेपर छान सोडवला. परीक्षा लांबत गेल्या. खूप दिवस प्रतीक्षा केली. आता निकाल लवकर लागावा.

- डाॅ. स्वाती पवार, परीक्षार्थी

--

मी फुलंब्री पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. यापूर्वी दोनवेळा परीक्षा दिली होती. तयारी सुरू होती. परीक्षा लांबल्याने अभ्यासाला वेळ मिळाला. मी आणि पतीनेही परीक्षा दिली.

- अनिता बनसोडे, परीक्षार्थी

---

सर्वच विषयांचा समतोल साधणारा पेपर होता. छान सोडवला. आता निकालाची प्रतीक्षा आहे. चांगल्या नियोजनामुळे अडचण आली नाही.

- विशाल गिरी, परीक्षार्थी

---

खूप सोपा पेपर होता. निकालही चांगला येईल अशी अपेक्षा आहे. परीक्षा लांबल्याने अभ्यासाला भरपूर वेळ मिळाला. त्यामुळे या परीक्षेचा निकालही उंचावण्याची शक्यता आहे.

- श्रुती तुगडे, परीक्षार्थी

---

अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक जणांचे वय निघून गेले. त्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. आज पेपर झाला तो चांगला गेला. निकाल लवकर लागावा.

- विक्रम पुरी, परीक्षार्थी

---

(सर्वांचे फोटो आहेत)