शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २७ पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:09 IST

पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.शेतकरी अलिकडील काळात आधुनिक शेतीकडे वळला आहे. याबरोबरच नगदी पिकांकडे त्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यात ऊसाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र होते. हे क्षेत्र आता १८ हजार ८०० हेक्टरवर गेले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दुष्काळाची तीव्रता असतानाही ऊसाच्या क्षेत्रात २००१ च्या तुलनेत वाढ झाल्याचेच दिसून येते. हीच बाब कापूस उत्पादनाच्या बाबतीत २००१ मध्ये जिल्ह्यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस घेण्यात येत होता.या क्षेत्रातही मोठी वाढ झाल्याचे २०१६ मधील आकडेवारी पाहिली असता दिसून येते.२०१५-१६ मध्ये ३ लाख ५२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पिक घेण्यात आले होते. सोयाबिनच्या क्षेत्रात मागील १५ वर्षात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येते. २००१ मध्ये अवघ्या १० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या सोयाबिनचे क्षेत्र २०१५-१६ मध्ये तब्बल २ लाख ७६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर जाऊन पोंहचले आहे. हीच बाब तेलबियाच्या उत्पादनाबाबत २००१ मध्ये जिल्ह्यातील शेतकºयांनी ५१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर तेलबियाचे उत्पादन घेतले होते. हे क्षेत्र आता २ लाख ८६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र एवढे वाढले आहे.