शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुस्कान-टू मोहिमेत २६ बालकामगारांना दिला न्याय

By admin | Updated: March 1, 2016 23:50 IST

हिंगोली : हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम मुस्कान आॅपरेशन टू मार्फत जिल्हाभरात राबविली जात आहे.

हिंगोली : हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम मुस्कान आॅपरेशन टू मार्फत जिल्हाभरात राबविली जात आहे. १ जुलै २०१५ पासून संपूर्ण देशामध्ये या मोहिमेत हरवलेल्या किंवा बालकामगार म्हणून पळवून नेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. हिंगोली व औंढा या दोन तालूक्यात एकूण २६ बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यांना बालनिरीक्षणगृह तसेच पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.अल्पवयीन मुले हरविल्यांच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अजाण बालकांना त्यांच्या कुटुंबाजवळून पळवून नेल्या जात आहे. मानवी तस्करी करणारे त्यांना राज्याबाहेर नेऊन बालकांना वाममार्ग किंवा बालमजुरी करण्यास भाग पाडत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून हिंगोली येथील संबंधित यंत्रणाही निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मुस्कान आॅपरेशनतंर्गत कारवाई करण्यात आली. १८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरातील बसस्थानकात पोनि जगदीश भंडारवार व पोलिस उपनिरीक्षक पी. एम. पाटकर यांनी कारवाई करून ७ बालकांना ताब्यात घेतले होते. सदर बालकांना मध्य प्रदेशातून बालमजुरीसाठी आणल्याचे उघडकीस आले. त्यांना परभणी येथील बाल निरीक्षणगृहात पाठविले असून त्यांच्या पालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पोलिस उपनिरीक्षक तान्हाजी चेरले यांनी १० बालकामगारांची सुटका करून त्यांना आईवडिलांच्या स्वाधीन केले. तसेच औंढा नागनाथ परिसरात मुस्कान आॅपरेशनतंर्गत पोलिस उपनिरीक्षक सविता सपकाळे यांच्या पथकाने व पोलिसमित्रांच्या मदतीने कारवाई केली. त्यात १० बालकामगारांची सुटका करून चिमुकल्यांना पालकांच्या स्वाधिन केल्याचे सपकाळे यांनी सांगितले.