शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचे २६ प्लांट

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : स्मार्ट औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली. शहरात मानांकन व अन्न ...

-साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : स्मार्ट औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली. शहरात मानांकन व अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंद असलेले २६ प्लांट जिल्ह्यात आहेत. परंतु आरो फिल्टर केलेले पाणी विकणाऱ्या जार विक्रेत्यांची संख्या १ हजार पेक्षा अधिक असून, त्यावर कोणाचेही बंधन नाही.

हे पाणी पिण्यास किती योग्य आणि जनतेने हे पाणी कधीही तपासले नाही किंवा त्याच्यावर मानांकन असलेला शिक्का नाही, प्लास्टिकचे जार विक्रमी विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णालय, हॉटेल, विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात जारचे पाणी पिण्याची फॅशन झाली आहे. रिकामे करून आणले जाणार त्याची सफाई गरम पाण्यात केली जाते काय, कोणत्या घरातून कोणता आला याचा काहीच थांगपत्ता नसतो. यातून कोरोना वाढतोय की घटतोय यावर कुणी लक्ष देत नाही. गल्लीबोळात फिल्टर पाणी विकण्याची दुकाने मांडली आहेत.

बाटलीबंद पाणी विकणाऱ्या मानांकन असलेल्या कंपन्यांची अन्न औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी होते, प्रत्येकवेळी सूचना दिल्या जातात. अन्यथा दंडात्मक कारवाई देखील केली जाते.

महानगरपालिका अथवा बोअरवेलचा पाणीपुरवठा केला जातो. पाण्यातील क्षार किती , फिल्टर केलेले पाणी जारच्या माध्यमातून अथवा लोकल भागात बाटलीबंद करून प्रवासी, यात्रा, उत्सवात विकले जाते. दोन पैशाने कमी मिळत असलेली पाण्याची बॉटल विकत घेऊन तहान भागविली जाते.

जिल्ह्यात नोंदणीकृत २६ प्लांट ....

कायद्याने नोंदणीकृत असलेले २६ प्लांट असून, बाटलीबंद पाण्याच्या कारखान्याचे नियंत्रण एफडीएकडे आहे. इतर गल्लीबोळात सुरू असलेल्या आरो प्लांटवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांचे नियंत्रण एफडीएकडे येत नाही.

- मिलिंद शहा,सह आयुक्त (अन्न व औषधी प्रशासन विभाग)