शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

२५५ शाळांच्या स्वच्छतागृहांची झाली पडझड

By admin | Updated: July 29, 2016 01:14 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या शाळांमधील २५५ स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, ४९ नवीन स्वच्छतागृहांची गरज असल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती उ

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या शाळांमधील २५५ स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, ४९ नवीन स्वच्छतागृहांची गरज असल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त, प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र निकम यांनी दिली. पालिकेच्या शाळांच्या इमारतींची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. काही इमारती धोकादायक झाल्या असून, स्लॅब पडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने इमारतींचे सर्वेक्षण करून अहवाल मागविला होता. मात्र शाळा इमारतींची दुरुस्ती अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गारखेडा परिसरातील एका शाळेला भेट दिली होती. यावेळी शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी शाळेच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी, प्रत्येक शाळेला पाण्याची सोय करून द्यावी, असे आदेश दिले होते. उपायुक्त निकम यांनी मुख्याध्यापकांमार्फत स्वच्छतागृहांचे अहवाल मागविले होते. उपायुक्त निकम म्हणाले, पालिकेच्या एकूण ७० शाळा असून, त्यात ३७४ स्वच्छतागृह आहेत. यापैकी केवळ ११९ वापरात असून, ४९ नवीन स्वच्छतागृहांची मागणी विविध शाळांकडून या अहवालात करण्यात आली आहे. नवीन तसेच जुन्या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीच्या कामाची संचिका शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्याकडे पाठविण्यात आली असून, लवकरच दुरुस्तीची कामे करण्यात येतील.