शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

जिल्ह्यातील २५ हजार शालेय मुली उपस्थिती भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:03 IST

औरंगाबाद : मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना प्राथमिक शिक्षण व समाजकल्याण विभागामार्फत उपस्थिती भत्ता दिला ...

औरंगाबाद : मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना प्राथमिक शिक्षण व समाजकल्याण विभागामार्फत उपस्थिती भत्ता दिला जातो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने गेल्या शैक्षणिक वर्षापासून उपस्थिती भत्ता रोखला. मात्र, समाजकल्याण विभागाने तो वाटप केला आहे. दरम्यान, शासनाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील २५ हजार शालेय मुली उपस्थिती भत्त्यापासून वंचित राहिल्या आहेत.

शाळांमधील मुलींची गळती थांबावी, मुलींची उपस्थिती वाढावी, या उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३ जानेवारी १९९२ पासून आदिवासी मुलींसह दारिद्र्य रेषेखालील मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना उपस्थिती भत्ता देण्याची योजना सुरू झाली. मात्र, प्राथमिक शाळा बंदच असल्याने सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आदिवासी व अनुसूचित जाती-जमाती, भटक्‍या व विमुक्‍त जमातीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींना उपस्थिती भत्ता देण्यास शासनाने असमर्थता दाखवली आहे.

औरंगाबाद प्राथमिक शिक्षण विभागाने मागील दोन वर्षांपूर्वी (सन २०१९-२०) जिल्हा परिषदेच्या शाळेतील २७ हजार २१० मुलींना उपस्थिती भत्ता वाटप केला होता. त्यानंतर शासनाकडून ‘तूर्त थांबा आणि वाट पाहा’ असा संदेश मिळाल्यामुळे उपस्थिती भत्त्यापासून या मुली वंचित राहिल्या आहेत. दुसरीकडे, ५ वी ते १० वीपर्यंतच्या अनुसूचित जाती, विमुक्त व भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. या विभागाने शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५ हजार २७३ मुलींना या शिष्यवृत्तीचे वाटप केले. राज्यात एकाच शासनाच्या अधिपत्याखालील दोन विभागांपैकी समाजकल्याण विभागाने उपस्थिती भत्ता वाटप केला, तर प्राथमिक शिक्षण विभागाने कोरोनाचे कारण देत तो थांबविला आहे.

चौकट..........................

व्हीजेएनटी, ओबीसीसाठी बजेटच नाही

इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींसाठी आर्थिक तरतूद मिळते, पण गेल्या दोन- तीन वर्षांपासून विमुक्त व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींच्या उपस्थिती भत्त्यासाठी समाजकल्याण विभागाला आर्थिक तरतूदच प्राप्त होत नाही. सन २०१९ पासून सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील मुलींचाही समावेश करण्यात आला. मात्र, या मुलीही उपस्थिती भत्त्यापासून वंचित राहिल्या आहेत.