शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पुलांना २५०० कोटी

By admin | Updated: October 7, 2016 01:26 IST

विकास राऊत , औरंगाबाद राज्यासह मराठवाड्यातील जुन्या पुलांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून, नवीन पूल बांधण्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद येत्या वर्षासाठी करण्यात आल्याचे

विकास राऊत , औरंगाबादराज्यासह मराठवाड्यातील जुन्या पुलांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून, नवीन पूल बांधण्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद येत्या वर्षासाठी करण्यात आल्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच राज्यात पावसामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी २ हजार कोटी रुपये लागतील, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. मराठवाड्यासाठी नियोजित मंत्रिमंडळ बैठकीसाठी बांधकाममंत्री पाटील हे शहरात आले होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांच्याशी संपर्क साधून मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि रस्ते विकासप्रकरणी काय अनुदान देणार, याप्रकरणी विचारणा करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या पुलांची पाहणी करण्याचे आदेश बांधकाममंत्र्यांनी दिले आहेत. मराठवाड्यात सर्व मिळून १ हजारांच्या आसपास लहान-मोठे पूल आहेत. त्यामध्ये ८१ पूल ब्रिटिश व निजामकालीन असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. जुने सर्व पूल नव्याने बांधावे लागणार असून, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ४०० कोटींची तरतूद होण्याचा अंदाज आहे. बांधकाममंत्री पाटील म्हणाले, मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर अतिवृष्टी झालेल्या पूर्ण जिल्ह्यांतील रस्ते, पुलांचा आढावा घेण्यात येईल. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे मूल्यांकन केल्यानंतर अंदाजपत्रकाच्या आधारे किती खर्च लागेल, याचा आकडा समोर येईल. सध्या तातडीने जेथे गरज असेल तेथे पॅचवर्क करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधणी करावी लागेल. एनएचएआय, सीआरएफ, पीडब्ल्यूडीच्या निधीतून काही रस्त्यांची कामे मराठवाड्यात सुरू आहेत. पुलांची पाहणी अजून सुरू आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची कामे वाढली आहेत.अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पंचनामे होणे अपेक्षित आहे. २२ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. त्यांना शासनाने मदत करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व चित्र समोर येईल, असे पाटील यांनी सांगितले.