शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

पुलांना २५०० कोटी

By admin | Updated: October 7, 2016 01:26 IST

विकास राऊत , औरंगाबाद राज्यासह मराठवाड्यातील जुन्या पुलांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून, नवीन पूल बांधण्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद येत्या वर्षासाठी करण्यात आल्याचे

विकास राऊत , औरंगाबादराज्यासह मराठवाड्यातील जुन्या पुलांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून, नवीन पूल बांधण्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद येत्या वर्षासाठी करण्यात आल्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच राज्यात पावसामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी २ हजार कोटी रुपये लागतील, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. मराठवाड्यासाठी नियोजित मंत्रिमंडळ बैठकीसाठी बांधकाममंत्री पाटील हे शहरात आले होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांच्याशी संपर्क साधून मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि रस्ते विकासप्रकरणी काय अनुदान देणार, याप्रकरणी विचारणा करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या पुलांची पाहणी करण्याचे आदेश बांधकाममंत्र्यांनी दिले आहेत. मराठवाड्यात सर्व मिळून १ हजारांच्या आसपास लहान-मोठे पूल आहेत. त्यामध्ये ८१ पूल ब्रिटिश व निजामकालीन असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. जुने सर्व पूल नव्याने बांधावे लागणार असून, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ४०० कोटींची तरतूद होण्याचा अंदाज आहे. बांधकाममंत्री पाटील म्हणाले, मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर अतिवृष्टी झालेल्या पूर्ण जिल्ह्यांतील रस्ते, पुलांचा आढावा घेण्यात येईल. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे मूल्यांकन केल्यानंतर अंदाजपत्रकाच्या आधारे किती खर्च लागेल, याचा आकडा समोर येईल. सध्या तातडीने जेथे गरज असेल तेथे पॅचवर्क करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधणी करावी लागेल. एनएचएआय, सीआरएफ, पीडब्ल्यूडीच्या निधीतून काही रस्त्यांची कामे मराठवाड्यात सुरू आहेत. पुलांची पाहणी अजून सुरू आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची कामे वाढली आहेत.अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पंचनामे होणे अपेक्षित आहे. २२ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. त्यांना शासनाने मदत करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व चित्र समोर येईल, असे पाटील यांनी सांगितले.