शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

उत्पन्नाच्या २५ % आरोग्यावर खर्च

By admin | Updated: August 3, 2014 01:12 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद शहरातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने टाकलेली कात आणि उपलब्ध झालेल्या अद्ययावत सुविधा, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे

बापू सोळुंके, औरंगाबादशहरातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने टाकलेली कात आणि उपलब्ध झालेल्या अद्ययावत सुविधा, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे दर आणि संपत चाललेली फॅमिली डॉक्टरची संकल्पना या पार्श्वभूमीवर लोकमत संपादकीय विभागाच्या वतीने शहरातील वैद्यकीय सेवांबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाने अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ६३ टक्के औरंगाबादकर आपल्या उत्पन्नापैकी सुमारे २५ टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करीत आहेत, तर सुमारे २५ टक्के नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी ३५ टक्क्यांपर्यंत खर्च करावा लागत आहे. ७ टक्के नागरिक असे आहेत की, त्यांच्या उत्पन्नातील अर्धी रक्कम ही कुटुंबातील सदस्यांच्या औषधोपचारावर खर्च करतात. महानगरपालिकेची शहरात लहान रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, मनपा आरोग्यसेवेने सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला आहे. केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून ३२.८५ टक्के नागरिकांनी घाटीची निवड केली. ५८ टक्के नागरिकांनी जवळच्या कोणत्याही रुग्णालयात, तर १७.१४ टक्के नागरिकांनी उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाणे पसंत केले आहे. शहरातील खाजगी आणि घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात नवीन सुविधांची भर पडली आहे, याबाबत सुमारे ६४ टक्के लोक अनभिज्ञ आहेत. इमर्जन्सी आरोग्यसेवेची गरज भासते तेव्हा ४७ टक्के नागरिकांनी घाटीत, तर ५१ टक्के नागरिकांनी खाजगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एका नागरिकाने मनपा रुग्णालय नमूद केले. पूर्वी घरातील कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी एक डॉक्टर ठरलेला असायचा. त्यास ‘फॅमिली डॉक्टर’ असे संबोधले जाते. आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्षआजारी पडल्यानंतर अथवा आजार तिसऱ्या अथवा चौथ्या टप्प्यात गेल्यानंतर रुग्ण दवाखान्यात जातो. तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. तेव्हा डॉक्टरांचे प्रयत्नही अपुरे पडतात. अशा प्रसंगांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने वर्षातून एक वेळ विविध प्रकारच्या तपासण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देतात. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात केवळ २५.७१ टक्के लोक हे कुटुंबातील व्यक्तींची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करतात.५२.८५ टक्के जण अशा प्रकारची तपासणी करीत नाहीत आणि ११.४२ टक्के नागरिकांनी आतापर्यंत कधीच आरोग्य तपासणी केली नसल्यााचे समोर आले आहे.महानगरपालिकेची शहरात लहान रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, मनपा आरोग्यसेवेने सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला आहे. केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. सुमारे २५ टक्के नागरिक वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपर्यंत खर्च करतात तर ७ टक्के नागरिक ४५ टक्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करीत असल्याचे समोर आले आहे.इमर्जन्सी आरोग्यसेवेची गरज भासते तेव्हा ४७ टक्के नागरिकांनी घाटीत, तर ५१ टक्के नागरिकांनी खाजगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एका नागरिकाने मनपा रुग्णालय नमूद केले. शहरातील खाजगी आणि घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात नवीन सुविधांची भर पडली आहे, याबाबत सुमारे ६४ टक्के लोक अनभिज्ञ आहेत.केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून ३२.८५ टक्के नागरिकांनी घाटीची निवड केली.६८ टक्के नागरिक म्हणतात फी खूप जास्तशहरातील खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारी फी खूप जास्त असल्याचे ३१.४२ टक्के नागरिकांना वाटते, तर ३७.१४ टक्के जणांना वैद्यकीय सेवेचे दर जास्त असल्याचे वाटते, तर ३१ टक्के नागरिकांनी वैद्यकीय उपचारासाठी आकारले जाणारे शुल्क समाधानकारक असल्याचे नमूद केले आहे.७३ टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून दूरवैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी सुमारे ६८ टक्के लोक आरोग्य विम्यापासून दूर असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर ४.२८ टक्के लोकांना आरोग्य विमा ही संकल्पनाच माहीत नाही. २७ टक्के लोकांनी आरोग्य विम्याचे छत्र घेतले आहे.