शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उत्पन्नाच्या २५ % आरोग्यावर खर्च

By admin | Updated: August 3, 2014 01:12 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद शहरातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने टाकलेली कात आणि उपलब्ध झालेल्या अद्ययावत सुविधा, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे

बापू सोळुंके, औरंगाबादशहरातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने टाकलेली कात आणि उपलब्ध झालेल्या अद्ययावत सुविधा, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे दर आणि संपत चाललेली फॅमिली डॉक्टरची संकल्पना या पार्श्वभूमीवर लोकमत संपादकीय विभागाच्या वतीने शहरातील वैद्यकीय सेवांबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाने अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ६३ टक्के औरंगाबादकर आपल्या उत्पन्नापैकी सुमारे २५ टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करीत आहेत, तर सुमारे २५ टक्के नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी ३५ टक्क्यांपर्यंत खर्च करावा लागत आहे. ७ टक्के नागरिक असे आहेत की, त्यांच्या उत्पन्नातील अर्धी रक्कम ही कुटुंबातील सदस्यांच्या औषधोपचारावर खर्च करतात. महानगरपालिकेची शहरात लहान रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, मनपा आरोग्यसेवेने सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला आहे. केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून ३२.८५ टक्के नागरिकांनी घाटीची निवड केली. ५८ टक्के नागरिकांनी जवळच्या कोणत्याही रुग्णालयात, तर १७.१४ टक्के नागरिकांनी उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाणे पसंत केले आहे. शहरातील खाजगी आणि घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात नवीन सुविधांची भर पडली आहे, याबाबत सुमारे ६४ टक्के लोक अनभिज्ञ आहेत. इमर्जन्सी आरोग्यसेवेची गरज भासते तेव्हा ४७ टक्के नागरिकांनी घाटीत, तर ५१ टक्के नागरिकांनी खाजगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एका नागरिकाने मनपा रुग्णालय नमूद केले. पूर्वी घरातील कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी एक डॉक्टर ठरलेला असायचा. त्यास ‘फॅमिली डॉक्टर’ असे संबोधले जाते. आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्षआजारी पडल्यानंतर अथवा आजार तिसऱ्या अथवा चौथ्या टप्प्यात गेल्यानंतर रुग्ण दवाखान्यात जातो. तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. तेव्हा डॉक्टरांचे प्रयत्नही अपुरे पडतात. अशा प्रसंगांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने वर्षातून एक वेळ विविध प्रकारच्या तपासण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देतात. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात केवळ २५.७१ टक्के लोक हे कुटुंबातील व्यक्तींची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करतात.५२.८५ टक्के जण अशा प्रकारची तपासणी करीत नाहीत आणि ११.४२ टक्के नागरिकांनी आतापर्यंत कधीच आरोग्य तपासणी केली नसल्यााचे समोर आले आहे.महानगरपालिकेची शहरात लहान रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने ती असून नसल्यासारखी आहेत. परिणामी, मनपा आरोग्यसेवेने सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला आहे. केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. सुमारे २५ टक्के नागरिक वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपर्यंत खर्च करतात तर ७ टक्के नागरिक ४५ टक्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करीत असल्याचे समोर आले आहे.इमर्जन्सी आरोग्यसेवेची गरज भासते तेव्हा ४७ टक्के नागरिकांनी घाटीत, तर ५१ टक्के नागरिकांनी खाजगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एका नागरिकाने मनपा रुग्णालय नमूद केले. शहरातील खाजगी आणि घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात नवीन सुविधांची भर पडली आहे, याबाबत सुमारे ६४ टक्के लोक अनभिज्ञ आहेत.केवळ पावणेसहा टक्के लोकच आजारी पडल्यास मनपाच्या दवाखान्यात जाणे पसंत करतात. खात्रीशीर उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणून ३२.८५ टक्के नागरिकांनी घाटीची निवड केली.६८ टक्के नागरिक म्हणतात फी खूप जास्तशहरातील खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारी फी खूप जास्त असल्याचे ३१.४२ टक्के नागरिकांना वाटते, तर ३७.१४ टक्के जणांना वैद्यकीय सेवेचे दर जास्त असल्याचे वाटते, तर ३१ टक्के नागरिकांनी वैद्यकीय उपचारासाठी आकारले जाणारे शुल्क समाधानकारक असल्याचे नमूद केले आहे.७३ टक्के नागरिक आरोग्य विम्यापासून दूरवैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी सुमारे ६८ टक्के लोक आरोग्य विम्यापासून दूर असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर ४.२८ टक्के लोकांना आरोग्य विमा ही संकल्पनाच माहीत नाही. २७ टक्के लोकांनी आरोग्य विम्याचे छत्र घेतले आहे.