शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

औरंगाबादमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेत २५ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:31 IST

विविध योजनांमध्ये २५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदुष्काळात भ्रष्टाचार दोषींवर कारवाई कधी होणार ?

- विकास राऊत 

औरंगाबाद : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कन्नड व इतर तालुक्यांत राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये २५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. जिल्हा नियोजन समिती, दिशा समितीच्या बैठकीत सदरील तक्रारीच्या अनुषंगाने चर्चा होतात. मात्र, सदरील प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर कारवाई केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सदरील योजनेबाबत पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, कंत्राटदार, मुख्य लेखाधिकारी आदींवर तक्रारीत ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने योजनेच्या कामाकडे का लक्ष दिले नाही. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही ही तक्रार देण्यात आली आहे. असे असतानाही चौकशी का होत नाही, असा सवाल २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हा व संनियंत्रण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षांनी केला. जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत खुलासा करताना सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याप्रकरणी कळविण्यात आले आहे. पूर्ण पाणीपुरवठा योजनेबाबत सदरील तक्रार आहे. एखाद्या गावाबाबत सदरील तक्रार नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काही पावले उचललेली नाहीत. 

जिल्ह्यात सर्व तालुक्यांत दुष्काळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणीपुरवठा करण्याचे सर्वात मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. ४ लाख लोकांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर लॉबीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पेयजल योजनेत घोटाळा झाल्याच्या तक्रारीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्तालय काहीही चौकशी का करीत नाही. दुष्काळात भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचा संशय यानिमित्ताने बळावला आहे. 

कशासाठी आणली योजना गावातील सर्व नागरिकांना घरोघरी किमान ४० एलपीसीडी पाणी मिळावे, या हेतूने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना २०१० पासून सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश पाण्याच्या स्रोताची शाश्वती, पाण्याची गुणवत्ता व कुटुंब पातळीवर जलसुरक्षा यावर भर देणे आहे. १०० टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश यात आहे. जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे, गाव हगणदारीमुक्त असण्यासारख्या योजनेच्या अटी आहेत. योजनेसाठी भूसंपादन, महसूल व वन विभाग, पीडब्ल्यूडी, जलसंपदा विभाग, रेल्वे व इतर विभागांची परवानगी आवश्यक आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारgovernment schemeसरकारी योजनाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद