शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेत २५ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:31 IST

विविध योजनांमध्ये २५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदुष्काळात भ्रष्टाचार दोषींवर कारवाई कधी होणार ?

- विकास राऊत 

औरंगाबाद : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कन्नड व इतर तालुक्यांत राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये २५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. जिल्हा नियोजन समिती, दिशा समितीच्या बैठकीत सदरील तक्रारीच्या अनुषंगाने चर्चा होतात. मात्र, सदरील प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर कारवाई केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सदरील योजनेबाबत पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, कंत्राटदार, मुख्य लेखाधिकारी आदींवर तक्रारीत ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने योजनेच्या कामाकडे का लक्ष दिले नाही. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही ही तक्रार देण्यात आली आहे. असे असतानाही चौकशी का होत नाही, असा सवाल २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हा व संनियंत्रण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षांनी केला. जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत खुलासा करताना सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याप्रकरणी कळविण्यात आले आहे. पूर्ण पाणीपुरवठा योजनेबाबत सदरील तक्रार आहे. एखाद्या गावाबाबत सदरील तक्रार नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काही पावले उचललेली नाहीत. 

जिल्ह्यात सर्व तालुक्यांत दुष्काळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणीपुरवठा करण्याचे सर्वात मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. ४ लाख लोकांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर लॉबीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पेयजल योजनेत घोटाळा झाल्याच्या तक्रारीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्तालय काहीही चौकशी का करीत नाही. दुष्काळात भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचा संशय यानिमित्ताने बळावला आहे. 

कशासाठी आणली योजना गावातील सर्व नागरिकांना घरोघरी किमान ४० एलपीसीडी पाणी मिळावे, या हेतूने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना २०१० पासून सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश पाण्याच्या स्रोताची शाश्वती, पाण्याची गुणवत्ता व कुटुंब पातळीवर जलसुरक्षा यावर भर देणे आहे. १०० टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश यात आहे. जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे, गाव हगणदारीमुक्त असण्यासारख्या योजनेच्या अटी आहेत. योजनेसाठी भूसंपादन, महसूल व वन विभाग, पीडब्ल्यूडी, जलसंपदा विभाग, रेल्वे व इतर विभागांची परवानगी आवश्यक आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारgovernment schemeसरकारी योजनाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद