शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात २४७ जणांनी थाटला ‘नोंदणीकृत’ संसार

By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा!

उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा! परंतु, वाढती महागाई, हॉलचे भाडे आदीमुळे स्वप्नातील विवाहसोहळे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत़ अनाठायी खर्चाला फाटा देत युवा पिढी नोंदणीकृत विवाहाला पसंती देत आहे़ जिल्ह्यात पाच वर्षात २४१ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह करून आपले संसार थाटले आहेत. ना जातीची अडचण ना पैशाची उधळपट्टी. उलट कायदेशीर मान्यता हे नोंदणी विवाहाचे वैशिष्ट्य आहे. नोंदणी विवाह करण्याचा सर्वात मोठा आणि प्राथमिक फायदा म्हणजे नोंदणीमुळे पती-पत्नीच्या नात्यावर कायद्याची मोहोर बसते. कोणत्याही नवदाम्पत्यासाठी ही कायदेशीर बाब पूर्ण होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडत. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे पारंपरिक पध्दतीने विवाह निश्चित करून नोंदणी पध्दतीने विवाह लावले जात आहेत. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हायचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डॉक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक परिवारात विवाह नोंदणी पध्दतीने करून नंतर पारंपरिक पध्दतीने स्वागत समारंभ पार पडतानाही दिसतात. उस्मानाबाद येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील २००९ पासून झालेल्या विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता २०१३ साल वगळता दरवर्षी ४० ते पन्नास विवाह नोंदणीकृत झाल्याचे दिसते. या कार्यालयात २००९ साली ४२ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह केले. २०१० व २०११ साली प्रत्येकी ४७ तर २०१२ मध्ये हा आकडा ४९ वर गेला होता. २०१३ मध्ये मात्र यात थोडीशी घट होऊन तो ३५ वर आला. तर चालू सन २०१४ मध्ये आतापर्यंत २१ जणांनी नोंदणीकृत विवाह केले आहेत. या विवाहासाठी खर्च अत्यल्प प्रमाणात येतो. ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करायचा असतो. मुलगा किंवा मुलगी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर नोटीस जारी केले जाते. यावर काही आक्षेप आले नाही तर नोटीस जारी केल्यापासून ३१ व्या दिवसापासून ९० दिवसांपर्यंत कधीही नोंदणी विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. नोंदणी केल्यानंतर विवाह न करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे येथील विशेष नोंदणी कार्यालय अधिकारी बी. बी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)