शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

पाच वर्षात २४७ जणांनी थाटला ‘नोंदणीकृत’ संसार

By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा!

उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा! परंतु, वाढती महागाई, हॉलचे भाडे आदीमुळे स्वप्नातील विवाहसोहळे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत़ अनाठायी खर्चाला फाटा देत युवा पिढी नोंदणीकृत विवाहाला पसंती देत आहे़ जिल्ह्यात पाच वर्षात २४१ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह करून आपले संसार थाटले आहेत. ना जातीची अडचण ना पैशाची उधळपट्टी. उलट कायदेशीर मान्यता हे नोंदणी विवाहाचे वैशिष्ट्य आहे. नोंदणी विवाह करण्याचा सर्वात मोठा आणि प्राथमिक फायदा म्हणजे नोंदणीमुळे पती-पत्नीच्या नात्यावर कायद्याची मोहोर बसते. कोणत्याही नवदाम्पत्यासाठी ही कायदेशीर बाब पूर्ण होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडत. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे पारंपरिक पध्दतीने विवाह निश्चित करून नोंदणी पध्दतीने विवाह लावले जात आहेत. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हायचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डॉक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक परिवारात विवाह नोंदणी पध्दतीने करून नंतर पारंपरिक पध्दतीने स्वागत समारंभ पार पडतानाही दिसतात. उस्मानाबाद येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील २००९ पासून झालेल्या विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता २०१३ साल वगळता दरवर्षी ४० ते पन्नास विवाह नोंदणीकृत झाल्याचे दिसते. या कार्यालयात २००९ साली ४२ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह केले. २०१० व २०११ साली प्रत्येकी ४७ तर २०१२ मध्ये हा आकडा ४९ वर गेला होता. २०१३ मध्ये मात्र यात थोडीशी घट होऊन तो ३५ वर आला. तर चालू सन २०१४ मध्ये आतापर्यंत २१ जणांनी नोंदणीकृत विवाह केले आहेत. या विवाहासाठी खर्च अत्यल्प प्रमाणात येतो. ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करायचा असतो. मुलगा किंवा मुलगी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर नोटीस जारी केले जाते. यावर काही आक्षेप आले नाही तर नोटीस जारी केल्यापासून ३१ व्या दिवसापासून ९० दिवसांपर्यंत कधीही नोंदणी विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. नोंदणी केल्यानंतर विवाह न करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे येथील विशेष नोंदणी कार्यालय अधिकारी बी. बी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)