शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

औरंगाबादहून रेल्वेने कोलकात्याला गेले २४६ टन कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:03 IST

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावरून शनिवारी २४६ टन कांदे घेऊन पहिली किसान रेल्वे कोलकात्याला रवाना झाली. देशात किसान ...

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावरून शनिवारी २४६ टन कांदे घेऊन पहिली किसान रेल्वे कोलकात्याला रवाना झाली. देशात किसान रेल्वेची सुविधा सुरू झाल्यानंतर औरंगाबादहून पहिल्यांदाच ही रेल्वे धावली. कृषी मालाची सुरक्षित आणि जलद वाहतूक सेवा देण्यासाठी किसान रेल्वेच्या माध्यमातून पाऊल पडले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ रोजी नगरसोल येथून धावली होती. त्यानंतर येथून अनेक किसान रेल्वे धावल्या. त्यातून संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरताला, फातुहा आदी ठिकाणी माल पाठविण्यात आला. किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावतात. यामुळे शेतमाल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स - टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ही दर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे त्यास प्रतिसाद वाढत आहे.

५.६० लाखांचे उत्पन्न

औरंगाबादहून रवाना झालेल्या पहिल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून ५ लाख ६० हजारांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. ही वाहतूक करण्यासाठी ११ लाखांवर रुपये लागले असते; परंतु किसान रेल्वेतून वाहतूक केल्याने ५० टक्के सवलत मिळाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---

फोटो ओळ...

औरंगाबादहून शनिवारी कांदा घेऊन पहिली किसान रेल्वे धावली. या रेल्वेत माल ठेवताना मजूर.