शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

औरंगाबादहून रेल्वेने कोलकात्याला गेले २४६ टन कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:03 IST

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावरून शनिवारी २४६ टन कांदे घेऊन पहिली किसान रेल्वे कोलकात्याला रवाना झाली. देशात किसान ...

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावरून शनिवारी २४६ टन कांदे घेऊन पहिली किसान रेल्वे कोलकात्याला रवाना झाली. देशात किसान रेल्वेची सुविधा सुरू झाल्यानंतर औरंगाबादहून पहिल्यांदाच ही रेल्वे धावली. कृषी मालाची सुरक्षित आणि जलद वाहतूक सेवा देण्यासाठी किसान रेल्वेच्या माध्यमातून पाऊल पडले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ रोजी नगरसोल येथून धावली होती. त्यानंतर येथून अनेक किसान रेल्वे धावल्या. त्यातून संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरताला, फातुहा आदी ठिकाणी माल पाठविण्यात आला. किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावतात. यामुळे शेतमाल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स - टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ही दर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे त्यास प्रतिसाद वाढत आहे.

५.६० लाखांचे उत्पन्न

औरंगाबादहून रवाना झालेल्या पहिल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून ५ लाख ६० हजारांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. ही वाहतूक करण्यासाठी ११ लाखांवर रुपये लागले असते; परंतु किसान रेल्वेतून वाहतूक केल्याने ५० टक्के सवलत मिळाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---

फोटो ओळ...

औरंगाबादहून शनिवारी कांदा घेऊन पहिली किसान रेल्वे धावली. या रेल्वेत माल ठेवताना मजूर.