शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात २४ विहिरींचे पुनर्भरण

By admin | Updated: May 3, 2016 01:11 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनी ‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनी ‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील २४ विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. अशोक तेजनकर, कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, अरुनिमा फाऊंडेशनचे प्रमुख रघुनंदन लाहोटी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांचीही उपस्थिती होती. ‘पाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन’ या विषयावर प्रा. तेजनकर यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, गेल्या वर्षी सरासरीहून थोडाच कमी पाऊस पडला तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. पाण्याचे पुनर्भरण या बाबतीत अद्यापही लोक जागरूक झालेले नाहीत. पाण्याचा प्रत्येक थेंब वाहून न जाऊ देता तो त्याच ठिकाणी मुरविला पाहिजे. ज्या जमिनीत पाणी मुरण्यास अडचणी येत असतील तेथे कृत्रिमरीत्या पाण्याचे पुनर्भरण झाले पाहिेजे.पाणी संकल्प हेच मोठे समाजकार्यप्रत्येकाने ‘पाणी संकल्प’ तयार करून राबविणे हे मोठे समाजकार्य आहे, असे यावेळी लाहोटी म्हणाले. रोहणवाडी परिसरात संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी लिटर पाणी साठविले असेही ते म्हणाले. ‘जलयुक्त विद्यापीठ’ उपक्रम २०१६-१७ चे ब्रीद असून आम्ही ‘स्मार्ट व्हिलेज’ मध्ये या परिसराचे रूपांतर करणार आहोत, असे कुलगुरूचोपडे म्हणाले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर इतिहास वस्तुसंग्रहालयासमोर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यावेळी डॉ. किशन धाबे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. अरुण खरात, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. स्मिता अवचार, स्मिता चावरे, डॉ. धनंजय माने आदींची उपस्थिती होती.