शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२४ गावे जोखीमग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:33 IST

संजय तिपाले , बीड मागील पाच वर्षांत साथरोगांचा उद्रेक झालेली २४ गावे यंदा आरोग्य विभागाने अतिजोखमीची म्हणून जाहीर केली आहेत. या गावांत जलजन्य आजारांची पुनरावृत्ती होऊ नये

संजय तिपाले , बीडमागील पाच वर्षांत साथरोगांचा उद्रेक झालेली २४ गावे यंदा आरोग्य विभागाने अतिजोखमीची म्हणून जाहीर केली आहेत. या गावांत जलजन्य आजारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाबरोबरच योग्य त्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. १७ जून रोजी नेकनूर (ता. बीड) येथे गॅस्ट्रोने पूजा महादेव जाधव या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे साथरोगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१२ पासून आतापर्यंत साथरोगामुळे तीन मृत्यू झाल्याची नोंद जि.प. च्या आरोग्य विभागाच्या दफ्तरी आहे; परंतु प्रत्यक्षात हा आकडा त्याहून अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पावसाळ्यात साथरोग आपले हातपाय पसरवत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत साथरोगाचे रुग्ण आढळलेली गावे जोखीमग्रस्त जाहीर करुन तेथे उपाय केले जातात. जिल्ह्यात अशी २४ गावे आहेत. गेवराई तालुक्यातील सर्वाधिक ९ गावांचा यात समावेश आहे. नदीकाठची १४९ व यात्रा भरणारी ३९ गावे देखील साथरोगांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आरोग्य विभागामार्फत सुरु आहेत. त्यासाठी या सर्व गावांमधील जलस्त्रोतांमध्ये लिक्वीड क्लोरिन टाकले असून १५ मिटर परिसरात साफसफाई करुन घाण पाणी साचणार नाही अशी व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)माजलगाव : सुर्डी, भीमनगर, आष्टी : देवीनिमगाव, शेकापूर, पाटोदा : खोकरमोहा, निवडुंगा, केज : होळ, माळेवाडी, मस्साजोग, धारुर : तांदळवाडी, अंजनडोह, गेवराई : अर्धमसला, पाचेगाव तांडा, गौडगाव तांडा, चोपड्याचीवाडी, गोपतपिंपळगाव, मन्यारवाडी, गुळज, भोगलगाव, मादळमोही, बीड : घोसापुरी, येळंबघाट, अंबाजोगाई: अंजनपूर, माळेवाडी ही गावे जोखमीची जाहीर केली आहेत.