शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

गतवर्षी हाणामारीत झाले तब्बल २४ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:46 IST

शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला.याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहराच्या तिन्ही बाजूने वाळूज, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन या एमआयडीसी आहे. यासोबत शेंद्रा पंचतारांकित वसाहत आणि नव्याने येऊ घातलेला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडणार आहे. उद्योग-व्यवसायानिमित्त देश-विदेशातील लोक औरंगाबादेत येत असतात. औद्योगिकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीसारख्या घटना घटल्याचा दावा शहर पोलिसांनी केला. कट रचून आणि सुपारी देऊन हत्या करण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने शासकीय पदावरील एका महिला अधिकाºयाने बँक अधिकारी असलेल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी शहरात घडली. अशा मोजक्या घटना सोडल्या, तर किरकोळ कारणावरून तब्बल २४ खून शहरात झाले.हाणामारीच्या घटना मात्र रोज घडत आहेत. वाहनाला कट का मारला, रागाने पाहणे, नळाच्या पाण्यावरून शेजाºयांतील भांडण, गुंडागर्दी करून हाणामारी होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अकरा महिन्यांच्या कालावधीत हाणामारीच्या ५०० हून अधिक घटना घडल्या. या घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.याविषयी सूत्रांकडून समजले की, शहरात रोज सहा ते सात हाणामारीच्या घटना घडतात. या हाणामारीत जखमी झालेले उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात आणि तेथून पुढे तडजोडीला सुरुवात होते. प्रकरण पोलिसांत गेले तर कोर्ट-कचेरीच्या चकरा माराव्या लागतील, पुन्हा पोलीस रेकॉर्ड तयार होऊन तरुणांच्या नोकरीसाठी ते अडसर ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन प्रकरण आपसात तडजोडीने मिटविले जाते. बºयाचदा पोलीसही अशावेळी मदत करतात.