शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

२४ तास पाणी !

By admin | Updated: April 15, 2017 23:34 IST

लातूर : लातूर महापालिकेत जर भाजपाची सत्ता आली तर शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले

लातूर : लातूर महापालिकेत जर भाजपाची सत्ता आली तर शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी लातूरकरांना दिले आहे. येथील राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, रमेश कराड, जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, अख्तर मिस्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, नेतृत्वात दम असला की विकास होतो. लातूरचे जगात नाव झाले ते रेल्वेने पाणी देण्यासाठी. ही काय नाव करायची गोष्ट आहे काय? आम्ही रेल्वेने पाणी पुरविले. जर मनपात आमची सत्ता आली तर या शहराला नागपूरच्या धर्तीवर २४ तास पाणीपुरवठा करणार आहोत. कचऱ्यापासून खतनिर्मिती करु. भारताच्या इतिहासात अटलबिहारी वाजपेयींच्या काळात १ लाख ७० गावांना जोडणारे रस्ते आम्ही दिले. चारपदरी महामार्ग दिले. आता मराठवाड्यात ९८ हजार कोटींचे तर लातुरात नऊ हजार कोटीचे महामार्ग बांधण्यात येतील. या महामार्गावरचे सर्व पूल हे ‘पूल कम् बंधारे’ असतील, असेही ते म्हणाले. मी आल्या-आल्या पालकमंत्र्यांना विचारले की, लातूरच्या एमआयडीसीला दररोज किती पाणी लागते हे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारा. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले तर तो विचारुन सांगतो, असे म्हणाला. ज्या अधिकाऱ्याला दररोज एमआयडीसीला पाणी किती लागते हे माहिती नाही, अशांना ठेवताच कशाला, असा सवाल गडकरी यांनी केला. आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला. तो म्हणजे नागपूरकरांनी टॉयलेटमध्ये वापरले पाणी रिसायकल करुन विकले. लातूरमध्ये असेच करण्यात येईल. वापरलेले पाणी रिसायकल करुन एमआयडीसीला देण्यात येईल, अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या आहेत़