शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

२४ तास पाणी !

By admin | Updated: April 15, 2017 23:34 IST

लातूर : लातूर महापालिकेत जर भाजपाची सत्ता आली तर शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले

लातूर : लातूर महापालिकेत जर भाजपाची सत्ता आली तर शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी लातूरकरांना दिले आहे. येथील राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, रमेश कराड, जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, अख्तर मिस्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, नेतृत्वात दम असला की विकास होतो. लातूरचे जगात नाव झाले ते रेल्वेने पाणी देण्यासाठी. ही काय नाव करायची गोष्ट आहे काय? आम्ही रेल्वेने पाणी पुरविले. जर मनपात आमची सत्ता आली तर या शहराला नागपूरच्या धर्तीवर २४ तास पाणीपुरवठा करणार आहोत. कचऱ्यापासून खतनिर्मिती करु. भारताच्या इतिहासात अटलबिहारी वाजपेयींच्या काळात १ लाख ७० गावांना जोडणारे रस्ते आम्ही दिले. चारपदरी महामार्ग दिले. आता मराठवाड्यात ९८ हजार कोटींचे तर लातुरात नऊ हजार कोटीचे महामार्ग बांधण्यात येतील. या महामार्गावरचे सर्व पूल हे ‘पूल कम् बंधारे’ असतील, असेही ते म्हणाले. मी आल्या-आल्या पालकमंत्र्यांना विचारले की, लातूरच्या एमआयडीसीला दररोज किती पाणी लागते हे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारा. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले तर तो विचारुन सांगतो, असे म्हणाला. ज्या अधिकाऱ्याला दररोज एमआयडीसीला पाणी किती लागते हे माहिती नाही, अशांना ठेवताच कशाला, असा सवाल गडकरी यांनी केला. आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला. तो म्हणजे नागपूरकरांनी टॉयलेटमध्ये वापरले पाणी रिसायकल करुन विकले. लातूरमध्ये असेच करण्यात येईल. वापरलेले पाणी रिसायकल करुन एमआयडीसीला देण्यात येईल, अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या आहेत़